शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Pune: पैशासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे पोलिसांची कामगिरी

By नितीश गोवंडे | Updated: August 7, 2023 16:12 IST

याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

पुणे : खासगी चारचाकी वाहन चालून उदनिर्वाह चालवणाऱ्या इसमाचे पैशासाठी अपहरण करण्यात आले. पोलिसांकडे तक्रार दाखल होतात, तपासाची चक्रे फिरली आणि सहा जणांच्या टोळीला पकडण्यात खंडणी विरोधी पथक १ च्या युनिट २ आणि उत्तमनगर पोलिसांना यश आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम वैभव जाधव (२६) यांनी ५ ऑगस्ट रोजी पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. यामध्ये त्यांचा पती वैभव श्रीकृष्ण जाधव (२७) यांचे जून्या पैशांच्या वादातून अक्षय मोहन पाटील (२८) याने ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास त्याच्या अन्य साथीदारांसोबत अपहरण केल्याचे म्हटले होते. या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपी यांचे मूळगाव सांगली जिल्याह्यातील असल्याने पोलिसांनी प्रथम सांगलीकडे तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा माहिती पडला, पोलिसांनी धाड टाकत आरोपी अक्षय मोहन कदम (२८), सुशांत मधुकर नलावडे (२६), महेश मलिक नलावडे (२५), बोक्या उर्फ रंजीत दिनकर भोसले (२६), प्रदीप किसन चव्हाण (२६) आणि अमोल उत्तम मोरे (३२) यांना सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून गावाबाहेर असलेल्या एका बंद पत्र्याच्या खोलीतून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी अपहरण केल्याचे मान्य केले. यावेळी त्यांच्या ताब्यातून अपहरण झालेले वैभव कदम यांची सुटका देखील करण्यात आली.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ चे सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, किरण बालवडकर, नंदकुमार बिडवई, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस अंमलदार रवींद्र फुलपगारे, किरण देशमुख, किरण ठवरे, उज्ज्वल मोकाशी, राजेंद्र लांडगे आणि ज्ञानेश्वर तोडकर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस