शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पैशासाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे पोलिसांची कामगिरी

By नितीश गोवंडे | Updated: August 7, 2023 16:12 IST

याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

पुणे : खासगी चारचाकी वाहन चालून उदनिर्वाह चालवणाऱ्या इसमाचे पैशासाठी अपहरण करण्यात आले. पोलिसांकडे तक्रार दाखल होतात, तपासाची चक्रे फिरली आणि सहा जणांच्या टोळीला पकडण्यात खंडणी विरोधी पथक १ च्या युनिट २ आणि उत्तमनगर पोलिसांना यश आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम वैभव जाधव (२६) यांनी ५ ऑगस्ट रोजी पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. यामध्ये त्यांचा पती वैभव श्रीकृष्ण जाधव (२७) यांचे जून्या पैशांच्या वादातून अक्षय मोहन पाटील (२८) याने ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास त्याच्या अन्य साथीदारांसोबत अपहरण केल्याचे म्हटले होते. या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपी यांचे मूळगाव सांगली जिल्याह्यातील असल्याने पोलिसांनी प्रथम सांगलीकडे तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा माहिती पडला, पोलिसांनी धाड टाकत आरोपी अक्षय मोहन कदम (२८), सुशांत मधुकर नलावडे (२६), महेश मलिक नलावडे (२५), बोक्या उर्फ रंजीत दिनकर भोसले (२६), प्रदीप किसन चव्हाण (२६) आणि अमोल उत्तम मोरे (३२) यांना सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून गावाबाहेर असलेल्या एका बंद पत्र्याच्या खोलीतून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी अपहरण केल्याचे मान्य केले. यावेळी त्यांच्या ताब्यातून अपहरण झालेले वैभव कदम यांची सुटका देखील करण्यात आली.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ चे सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, किरण बालवडकर, नंदकुमार बिडवई, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस अंमलदार रवींद्र फुलपगारे, किरण देशमुख, किरण ठवरे, उज्ज्वल मोकाशी, राजेंद्र लांडगे आणि ज्ञानेश्वर तोडकर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस