शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

खडकवासला धरणातील आर्वतन उद्या होणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 20:28 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागाला सुमारे तीन टीएमसी पाणी देण्यात आले.यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे टेमघरमध्ये सध्या शून्य टीएमसी पाणी

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातून दौंड, इंदापूर व बारामतीमधील काही ग्रामीण भागासाठी सोडलेले आवर्तन अंतिम टप्प्यात असून येत्या शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी धरणातील आवर्तन बंद केले जाणार आहे. कालव्यातून सुमारे ३० दिवस ग्रामीण नागरिकांना पाणीसाठी व शेतीसाठी पाणी सोडण्यात आले, असे खडकवासला धरण प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यातच पुणे महापालिकेचा पाणी वापर वाढल्याने यंदा ग्रामीण भागाला दिले जाणारे एक आवर्तन रद्द करण्यात आले आहे. गेल्या १२ मार्चपासून ग्रामीण भागासाठी या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. जलसंपदा विभागाकडून ७ मे पर्यंत (२७ दिवस) हे आवर्तन दिले जाणार होते. मात्र, त्यात तीन दिवस वाढ करून १० मे पर्यंत पाणी सोडले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ग्रामीण भागास २.६८ टीएमसी पाणी दिले जाणार होते. परंतु, तीन दिवस अधिक पाणी सोडल्याने ग्रामीण भागाला सुमारे तीन टीएमसी पाणी देण्यात आले. दरवर्षी ग्रामीण भागाला उन्हाळ्यातील आवर्तन सोडताना ४ ते ४.५ टीएमसी पाणी दिले जाते. मात्र, यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात केली आहे.---खडकवासला धरण प्रकल्पात ५ टीएमसी पाणी खडकवासला धरण प्रकल्पात गुरूवारी (दि.९) ५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी ९ मे रोजी धरणात ८.०७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा धरणात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे. टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे टेमघरमध्ये सध्या शून्य टीएमसी पाणी आहे. खडकवासला धरणात ०.५३ टीएमसी, पानशेतमध्ये २.९६ टीएमसी आणि वरसगाव धरणात १.५२ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणी