शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

खडकवासला धरणातील आर्वतन उद्या होणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 20:28 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागाला सुमारे तीन टीएमसी पाणी देण्यात आले.यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे टेमघरमध्ये सध्या शून्य टीएमसी पाणी

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातून दौंड, इंदापूर व बारामतीमधील काही ग्रामीण भागासाठी सोडलेले आवर्तन अंतिम टप्प्यात असून येत्या शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी धरणातील आवर्तन बंद केले जाणार आहे. कालव्यातून सुमारे ३० दिवस ग्रामीण नागरिकांना पाणीसाठी व शेतीसाठी पाणी सोडण्यात आले, असे खडकवासला धरण प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यातच पुणे महापालिकेचा पाणी वापर वाढल्याने यंदा ग्रामीण भागाला दिले जाणारे एक आवर्तन रद्द करण्यात आले आहे. गेल्या १२ मार्चपासून ग्रामीण भागासाठी या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. जलसंपदा विभागाकडून ७ मे पर्यंत (२७ दिवस) हे आवर्तन दिले जाणार होते. मात्र, त्यात तीन दिवस वाढ करून १० मे पर्यंत पाणी सोडले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ग्रामीण भागास २.६८ टीएमसी पाणी दिले जाणार होते. परंतु, तीन दिवस अधिक पाणी सोडल्याने ग्रामीण भागाला सुमारे तीन टीएमसी पाणी देण्यात आले. दरवर्षी ग्रामीण भागाला उन्हाळ्यातील आवर्तन सोडताना ४ ते ४.५ टीएमसी पाणी दिले जाते. मात्र, यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात केली आहे.---खडकवासला धरण प्रकल्पात ५ टीएमसी पाणी खडकवासला धरण प्रकल्पात गुरूवारी (दि.९) ५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी ९ मे रोजी धरणात ८.०७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा धरणात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे. टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे टेमघरमध्ये सध्या शून्य टीएमसी पाणी आहे. खडकवासला धरणात ०.५३ टीएमसी, पानशेतमध्ये २.९६ टीएमसी आणि वरसगाव धरणात १.५२ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणी