शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा, राजकीय श्रेयवादात काम रखडले, पुणे महानगरपालिकेचा गलथान कारभार, ३२ बळी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 3:04 AM

मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेला मुंबई-सोलापूर बायपास रस्ता म्हणजेच कात्रज-कोंढवा रस्ता. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून पालिका प्रशासनाच्या दरबारी प्रलंबित पडला आहे. आतापर्यंत या रस्त्यावर अपघात होऊन ३२ निष्पापांनी आपले प्राण गमावले आहेत.

कात्रज : मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेला मुंबई-सोलापूर बायपास रस्ता म्हणजेच कात्रज-कोंढवा रस्ता. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून पालिका प्रशासनाच्या दरबारी प्रलंबित पडला आहे. आतापर्यंत या रस्त्यावर अपघात होऊन ३२ निष्पापांनी आपले प्राण गमावले आहेत. अजून किती बळी गेल्यावर येथील राजकारण थांबवून पालिका प्रशासन हा रस्ता रुंदीकरण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शुक्रवारी (दि. ८) कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडीमशीन पोलीस चौकीसमोर कंटेनरचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या विचित्र अपघातात दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या रस्त्यावर अनेकदा निविदा काढण्यातआल्या. अजूनही काढण्यात येतील मात्र या रस्त्यावरील अतिक्रमणे आधी पालिकेने काढणे अपेक्षित आहे.गोरगरिबांच्या अनधिकृत घरावर बुलडोझर फिरवणारी पालिका या मुख्य रस्त्यावर ज्यांनी आपली दुकाने व घरे थाटली आहेत त्यांच्यावर कारवाई का करत नाही.पालिका कर्मचा-यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळेच या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे कधीही काढण्यात आली नाहीत. त्यामुळेच या रस्त्यावर अनेकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले.पालिका प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षितपालिका प्रशासनाने या रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांना तातडीने नोटिसा देऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच येथील अतिक्रमणे काढण्यासाठीचा खर्चदेखील अतिक्रमण करणाºया व्यक्तीकडून वसूल करणे अपेक्षित आहे. ज्या व्यक्ती या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढीत नसतील त्यांना या रस्त्यावर होणाºया अपघातासाठी का जबाबदार धरले जाऊ नये, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. ज्या व्यक्तींनी अतिक्रमणे केलेली आहेत, त्यांच्यामुळेच रस्ता अरुंद झाला आहे, तसेच या भागाच्या विकासाला खीळदेखील बसली आहे. पालिका प्रशासनाने या ठिकाणी आता सर्व राजकीय दबाव झुगारून या ठिकाणी मोठी अतिक्रमण हटाव कारवाई करणे अपेक्षित आहे.ढिसाळ कारभार; राजकीय इच्छाशक्तीचा अभावपुणे महानगरपालिकेच्या जुन्या व नव्या विकास आराखड्यात २८० फूट रस्ता प्रस्तावित आहे. मात्र सध्या तो ४० ते ५० फूट इतका अरुंद झालेला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुरुवातीला ९० कोटी बजेट अपेक्षित होते. मात्र त्या वेळी हे काम न केल्यामुळे आता या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे २०० कोटी रुपये लागणार आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागा हस्तांतरणापैकी सुमारे ७० ते ८० टक्के जागा हस्तांतर झाले असून उर्वरित जागामालक जागा द्यायला तयारदेखील आहेत. मात्र पालिकेचा ढिसाळ कारभार व येथील राजकीय इच्छाशक्ती आडवी येत आहे.येथील स्थानिक नगरसेवक, आमदार यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वेळोवेळी आवाज उठवले, मात्र त्यांच्या आवाजाच्या ताकदीमध्ये कुठेतरी कमतरता दिसत आहे. त्यामुळेच की काय अजूनही या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागलेला दिसत नाही. पुढील आठवड्यात या रस्त्याच्या कामाची निविदा लागून कामास सुरुवात होणार आहे, अशी चर्चा या भागात आहे. मात्र अशा चर्चेची गुºहाळे ऐकतच या रस्त्याने ३२ निष्पापांचे बेळी घेतले आहेत, हेच या ठिकाणचे वास्तव आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात