शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

काश्मीर हा भारताचा पूर्वापार अविभाज्य भागच : 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 07:00 IST

'काश्मीर’ म्हटलं की फक्त बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया, जवानांवर हल्ला हेच ऐकायला मिळतात..

ठळक मुद्देप्रशांत तळणीकर यांनी मराठीत अनुवाद केलेल्या  ‘जोनराजकृत राजतरंगिणी’ पुस्तक प्रकाशन

अपवाद वगळता एकाही भारतीय नागरिकाला काश्मीरचा इतिहास फारसा माहिती नाही. पुण्यातील काश्मीर इतिहासाचे अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी मराठीत अनुवाद केलेल्या  ‘जोनराजकृत राजतरंगिणी’या पुस्तक प्रकाशनानिमित्ताने त्यांच्याशी ’लोकमत’ ने संवाद साधला. -नम्रता फडणीस * काश्मीरचा मूळ इतिहास काय आहे?- काश्मीर हा इतिहासापासूनच भारताचा अविभाज्य भाग आहे.कल्हणाची धुतराष्ट्र राजतरंगिणी हा संस्कृतमधील काश्मीरचा इतिहास भारतामधला अधिकृत इतिहास आहे. हे ब्रिटीशांनी आणि अभ्यासकांनी देखील मानले आहे. हे जर सत्य मानलं तर काश्मीरचा इतिहास हा महाभारतकालापासून सुरू होतो. काश्मीरमध्ये साडेतीनशे वर्ष हिंदू राजवट होती. तोपर्यंत राजे, कवी,कलावंत यांच्यामध्ये आदानप्रदान होत होते. हिंदू राजवट संपून मग मुस्लिम राजवट आली. त्यामुळे काश्मीर भारताचा भाग होता किंवा नव्हता याचा वेगळा पुरावा असण्याची गरजच नाही. * काश्मीरमधील धार्मिक इतिहास काय सांगतो? - काश्मीर मध्ये मूळ वैदिक धर्माबरोबरच बौद्ध धर्मही होता. त्यानंतर इस्लाम धर्म आला. काश्मीरमधील हा इस्लाम भारतीय इस्लाम आहे. जे जे नवीन आले ते लोकांनी स्वीकारले. ‘काश्मिरीयत’ म्हणजे काय तर वैदिक, जैन, बौद्ध आणि इस्लाम धर्माची सरमिसळ आहे. याच रसायन म्हणजे काश्मीर आहे. प्रत्येक धर्म, संस्कृती आणि विचार वेगळा आहे. 1947 नंतर भारताची फाळणी झाली. तेव्हा काश्मीर मुस्लिम बहुल होते. पण फाळणीनंतर काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या नाहीत. थोडक्यात सामान्य जनतेमध्ये धार्मिक ध्रृवीकरण फारसे झालेले नाही. पंडितांना काश्मीरमधून हाकलून लावण्यात आले त्यांच्यावर अत्याचार झाले हा काश्मीरवरचा काळा डाग आहे. पण आजही तिथे पंडित आणि मंदिरे आहेत. * काश्मीरच्या प्रश्नाकडे पाहाण्याचा तिथल्या समाजाचा दृष्टीकोन कसा आहे?- या प्रश्नात राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि धार्मिक राजकारण गुंतलेले आहे. काश्मिरी मुसलमान मंदिरात पण जातात घरात गणपती पण बसवतात. समाजात ज्याप्रमाणे वेगवेगळे घटक असतात. तसेच तिथेही बंडखोरी, विद्रोह आहे. पाकिस्तानचा झेंडा कुणी तरी फडकवत असेलही. पण अजूनही 80 टक्के काश्मिरी जनता ही भारताच्या बाजूने आहे तर काहींना स्वतंत्र काश्मीर हवा आहे. * इतिहासाच्या मांडणीतून  गोष्टी साध्य होईल असे वाटते का?-आजपर्यंत शाळांमध्ये काश्मीरचा इतिहास कधीही शिकवला गेलेला नाही.  काश्मीरचा पहिला ललितादित्य नावाचा राजा होता.ज्याचे तुर्कस्थानपर्यंत राज्य होते. सातव्या-आठव्या शतकापर्यंत त्याची राजवट होती. काश्मीरशी जोडल्या गेलेल्या गोष्टींची किमान माहिती असायला हव्यात.  

टॅग्स :PuneपुणेhistoryइतिहासJammu Kashmirजम्मू-काश्मीर