शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

कसबा विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेसला हवीय संजीवनी अन् भाजपला जपायचीय प्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:21 IST

भाजपने थेट उपमुख्यमंत्र्यांचाच आधार घेतला, त्याचबरोबर राज्यातील मंत्रीही मतदारसंघात आणले...

- राजू इनामदार

पुणे: कसबा विधानसभेची पोटनिवडणूक अशा वेळेला होत आहे की त्यानंतर लगेचच महापालिका, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाला चांगलेच महत्त्व आले आहे. पुढच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला इथून संजीवनी हवी आहे तर भारतीय जनता पक्षाला आपली तब्बल ३० वर्षांची प्रतिष्ठा जपायची आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी चांगलाच जोर लावण्यात आला आहे.

भाजपने थेट उपमुख्यमंत्र्यांचाच आधार घेतला. त्याचबरोबर राज्यातील मंत्रीही मतदारसंघात आणले. त्याशिवाय इतर सहकारी पक्षांची बेरीज केली. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नसल्याची नाराजी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश व मुलगा कुणाल यांनाच प्रचारात उतरवले. बॅनरबाजीला प्रत्युत्तर न देण्याचे शहाणपण दाखवले. ‘हा तर आपला बालेकिल्ला’ असे समजून गाफील न राहता बालेकिल्ला अधिक मजबूत करण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे. सर्वपरिचित असा उमेदवार देऊन आता त्याला सर्व प्रकारची राजकीय मदत करून उजळून टाकण्याचे काम ते करत आहेत. त्यासाठी प्रचारफेऱ्या, पदयात्रा हे नेहमीचे उपाय तर आहेच, शिवाय मतदारसंघातील वेगवेगळ्या गटांच्या स्वतंत्र बैठका घेत, त्यांना पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने देत हे गट बांधून घेण्याची चतुराई दाखवत आहेत.

महाविकास आघाडीत ३ पक्ष आहेत. ताकदही तीन पट दिसायला हवी. भर निवडणुकीत माध्यमांसमोर वादावादी करण्याचे वृथा धाडस काँग्रेसचे नेते दाखवतात हे आश्चर्यजनक आहे. तरीही त्यांच्या उमेदवाराचे सतत लोकांमध्ये असणे ही त्यांच्या जमेची बाजू आहे. मात्र सहकारी पक्षांना धरून राहणे, त्यांना राजकीय महत्त्व देणे, त्यांचे नेते सतत बरोबर राहतील याची काळजी घेणे हेही त्यांनी करायला हवे. ३० वर्षांची मक्तेदारी मोडून काढणे सोपे काम नाही. संजीवनी मिळवायची तर त्यासाठी कष्टही तेवढेच करायला हवे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना यांनाही कसब्यात विजय मिळाला तर संजीवनीच मिळणार आहे. मतदारांना जाग आणण्याचे काम त्यांच्याकडून अधिक प्रभावीपणे व्हायला हवे.

राजकीय साठमारीत कसब्यासारख्या पुण्याचे हृदय असलेल्या मतदारसंघाचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. वाहतुकीची कायमची कोंडी, वाहनतळांचा अभाव, ऐतिहासिक वास्तूंकडे झालेले दुर्लक्ष, नागरिकांसाठी पोहण्याचा तलाव, महिलांसाठी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे अशा साध्या गोष्टीही या मतदारसंघात नाहीत. महाविकास आघाडी, भाजप या प्रमुख उमेदवारांसह अन्य काही अपक्ष उमेदवारही निवडणुकीत आहेत. त्यांनी या समस्यांवर नागरिकांबरोबर बोलण्याचे धाडस दाखवावे. तोच खरा प्रचार होईल.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाkasba-peth-acकसबा पेठ