शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

कसबा विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेसला हवीय संजीवनी अन् भाजपला जपायचीय प्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:21 IST

भाजपने थेट उपमुख्यमंत्र्यांचाच आधार घेतला, त्याचबरोबर राज्यातील मंत्रीही मतदारसंघात आणले...

- राजू इनामदार

पुणे: कसबा विधानसभेची पोटनिवडणूक अशा वेळेला होत आहे की त्यानंतर लगेचच महापालिका, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाला चांगलेच महत्त्व आले आहे. पुढच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला इथून संजीवनी हवी आहे तर भारतीय जनता पक्षाला आपली तब्बल ३० वर्षांची प्रतिष्ठा जपायची आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी चांगलाच जोर लावण्यात आला आहे.

भाजपने थेट उपमुख्यमंत्र्यांचाच आधार घेतला. त्याचबरोबर राज्यातील मंत्रीही मतदारसंघात आणले. त्याशिवाय इतर सहकारी पक्षांची बेरीज केली. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नसल्याची नाराजी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश व मुलगा कुणाल यांनाच प्रचारात उतरवले. बॅनरबाजीला प्रत्युत्तर न देण्याचे शहाणपण दाखवले. ‘हा तर आपला बालेकिल्ला’ असे समजून गाफील न राहता बालेकिल्ला अधिक मजबूत करण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे. सर्वपरिचित असा उमेदवार देऊन आता त्याला सर्व प्रकारची राजकीय मदत करून उजळून टाकण्याचे काम ते करत आहेत. त्यासाठी प्रचारफेऱ्या, पदयात्रा हे नेहमीचे उपाय तर आहेच, शिवाय मतदारसंघातील वेगवेगळ्या गटांच्या स्वतंत्र बैठका घेत, त्यांना पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने देत हे गट बांधून घेण्याची चतुराई दाखवत आहेत.

महाविकास आघाडीत ३ पक्ष आहेत. ताकदही तीन पट दिसायला हवी. भर निवडणुकीत माध्यमांसमोर वादावादी करण्याचे वृथा धाडस काँग्रेसचे नेते दाखवतात हे आश्चर्यजनक आहे. तरीही त्यांच्या उमेदवाराचे सतत लोकांमध्ये असणे ही त्यांच्या जमेची बाजू आहे. मात्र सहकारी पक्षांना धरून राहणे, त्यांना राजकीय महत्त्व देणे, त्यांचे नेते सतत बरोबर राहतील याची काळजी घेणे हेही त्यांनी करायला हवे. ३० वर्षांची मक्तेदारी मोडून काढणे सोपे काम नाही. संजीवनी मिळवायची तर त्यासाठी कष्टही तेवढेच करायला हवे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना यांनाही कसब्यात विजय मिळाला तर संजीवनीच मिळणार आहे. मतदारांना जाग आणण्याचे काम त्यांच्याकडून अधिक प्रभावीपणे व्हायला हवे.

राजकीय साठमारीत कसब्यासारख्या पुण्याचे हृदय असलेल्या मतदारसंघाचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. वाहतुकीची कायमची कोंडी, वाहनतळांचा अभाव, ऐतिहासिक वास्तूंकडे झालेले दुर्लक्ष, नागरिकांसाठी पोहण्याचा तलाव, महिलांसाठी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे अशा साध्या गोष्टीही या मतदारसंघात नाहीत. महाविकास आघाडी, भाजप या प्रमुख उमेदवारांसह अन्य काही अपक्ष उमेदवारही निवडणुकीत आहेत. त्यांनी या समस्यांवर नागरिकांबरोबर बोलण्याचे धाडस दाखवावे. तोच खरा प्रचार होईल.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाkasba-peth-acकसबा पेठ