शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

kartiki wari 2021: यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर, वारी होणार की नाही निर्णय प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 15:19 IST

माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ

आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात कार्तिकी यात्रेला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. कार्तिक वैद्य अष्टमीला गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्यास सुरुवात होणार असून मुख्य पहाटपूजा ३० नोव्हेंबरला तर माऊलींचा संजीवन सोहळा २ डिसेंबरला पार पडणार आहे. तत्पूर्वी आळंदीतील कार्तिकीवारी लाखों वारकऱ्यांच्या उपस्थित साजरी होणार की नाही? याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत सूचना जारी करण्यात आली नसल्याने तमाम वारकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागलेले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे माऊलींचा संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकीवारी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली आहे. तर आषाढीवारीही शासनाच्या नियमांना अधीन राहून मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत वाहनाद्वारे पूर्ण केली आहे. मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. तर अनेकांचे दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर पंढरीत भरणाऱ्या कार्तिकी यात्रेला शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदाची कार्तिकी यात्रा परंपरेनुसार दिमाखात साजरी होईल अशी आशा वारकऱ्यांमध्ये लागून आहे. 

         दरम्यान यंदाचा कार्तिकी वारी सोहळा शासनाच्या पूर्वपरवानगीने लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न व्हावा; असा प्रस्ताव जिल्हाधिकरी डॉ. विकास देशमुख यांच्याकडे दिवाळीपूर्वी सादर करण्यात आला आहे. अद्याप कार्तिकीवारी आयोजनाबाबत प्रशासनाकडून निर्णय जाहीर झाला नसला तरीसुद्धा यंदा परवानगी मिळेल अशी आशा वारकरी संप्रदायात दिसून येत आहे.

कार्तिकीवारीत सुमारे सहा ते  सात लाखांहून अधिक भाविक दाखल होऊ शकतात

 माऊलींचा संजीवन समाधी सोहळा अर्थात  कार्तिकी उत्सव सात ते आठ दिवस चालणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक - भक्तांची मांदियाळी हा आनंददायी सुख सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी अलंकापुरीत हजेरी लावते. सलग दोन वर्षे आषाढी तसेच कार्तिकीवारी प्रत्यक्ष हजेरी लावून अनुभवता न आल्याने यंदाच्या कार्तिकीवारीत सुमारे सहा ते  सात लाखांहून अधिक भाविक दाखल होऊ शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे.

शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा 

आळंदीची कार्तिकीवारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र अद्यापही वारीच्या परवानगी बाबत निर्णय प्रलंबित आहे. कार्तिकी वारीची व्याप्ती मोठी असल्याने स्थानिक प्रशासन व देवस्थानला यात्रेची चोख तयारी करण्यासाठी किमान एक महिना अवधी लागत असतो. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. तद्नंतर आळंदीत येणाऱ्या दिंड्यांना देवस्थानकडून सूचना देणे सोयीचे होईल.  

टॅग्स :AlandiआळंदीPuneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरTempleमंदिर