शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कळमोडी धरण तयार; पण उपसा योजना प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:18 IST

आंदोलनाचा इशारा : ८४६ हेक्टर क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी

दावडी : कळमोडी धरण बांधून तयार आहे; परंतु धरणातून प्रस्तावित असलेली उपसा जलसिंचन योजना अनेक वर्षे प्रलंबित आहे. सातगाव पठार भागातील ५,०६६ हेक्टर क्षेत्र व खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरूडे, वाफगाव या गावांतील ८४३ हेक्टर क्षेत्रासाठी कळमोडीचे पाणी मिळण्यासाठी खेड व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ आवळली आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा नदीवर बांधण्यात आलेल्या कळमोडी धरणाची एकूण साठवण क्षमता दीड टीएमसी इतकी आहे. या धरणातील पाणी चासकमान धरणात येते. चासकमान धरणातील काही पाणीसाठा पुन्हा पाईपलाईनद्वारे आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार या परिसरातील वेळ नदीत सोडण्यात येणार होते. वेळ नदी आंबेगाव तालुक्यातील सात गावांतून पुढे जाते,ती खेड तालुक्याच्या पूर्व भागातून जाते. मात्र, ही योजना बारगळली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे कळमोडी धरण्याच्या पाण्याबाबत भिजत घोंगडे पडले आहे. खेड तालुुक्याच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई असल्याने या भागांतील नागरिकांच्या भावना तीव्र आहे. दुष्काळाची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी आझाद मैदानात पाच दिवस धरणे आंदोलन केले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भेटी घेतल्या. या भागातील सर्व गावांचे सरपंच, कळमोडी धरण प्रकल्प कृती समितीचे पदाधिकारी, कनेरसर येथील यमाई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मोहनराव दौंडकर व कुरवंडीचे सरपंच सुनीलराव तोत्रे यांच्या पुढाकाराने पेठ येथे बैठक झाली. या बैठकीस वरूडेचे सरपंच मारुती थिटे, अजय भागवत, संदीप गावडे, श्रीनिवास गावडे, हनुमंतराव दौंडकर तसेच सातगाव पठार गावातील सरपंच, आंबेगाव बाजार समिती संचालक जयसिंग एरंडे व डॉ. ताराचंद कराळे तसेच शेतकरी उपस्थित होते. बैठकीत या प्रश्नी लढा देण्यासाठी कळमोडी प्रकल्प कृती समिती स्थापन करून सर्व गावच्या ग्रामसभा घेऊन शासनाला गांभीर्य लक्षात यावे, यासाठी सर्व ग्रामसभांचे ठराव पाठवून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी एकत्रित पाठपुरावा करण्याचे ठरले, त्यानुसार सातगाव पठार, खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, गोसासी, वरूडे, वाफगाव व शिरुर तालुक्यातील केंदुर, पाबळ या गावांच्या विशेष ग्रामसभा २५ तारखेपर्यंत घेऊन सर्व गावांची पुन्हा एकत्रित बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे अशोक टाव्हरे यांनी सांगितले.आंदोलनाचा इशारा...मागील महिन्यात झालेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर होत असताना खेड, आंबेगावच्या लोकप्रतिनिधींनी कोणताही तारांकित प्रश्न वा लक्षवेधी कळमोडी संदर्भात केली नाही, असा आरोप शेतकºयांनी केला आहे. थिटेवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत पाबळ, केंदूर येथील नागरिकांची मागणी आहे. या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी अशोक टाव्हरे यांनी कळमोडी पाणलोट विकास संस्थेची स्थापना केली असून, मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना निवेदन देऊन तातडीने अंदाजपत्रक मंजुरी व निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. शासनाने न्याय दिला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दि. १० जानेवारी पासून बेमुदत धरणे धरण्याचा इशारा येथील शेतकºयांनी दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण