शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'कराडला फाशी झालीच पाहिजे', पुण्यात जनआक्रोश मोर्चा, कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:50 IST

बीडमध्ये कराडसारखे गुंड कंबरेला बंदूक लावून फिरतायेत, नागरिक आता घाबरलेत, सरकारने यांची गुंडगिरी थांबवली पाहिजे

पुणे : सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, मारेकरांना कठोर शिक्षा द्या, अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बीड हा दहशतीचा बालेकिल्ला झाला आहे. कराडसारखे गुन्हेगार मोकाट फिरू लागले आहेत. अत्यंत वाईट प्रकारे यांची हाती करण्यात आली आहे. यामध्ये कराडचा हात आहे. त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. कराडला सध्या नुसती अटक करण्यात आली आहे. पण पुढची काहीच प्रक्रिया होताना दिसत नाहीये. बीडच्या प्रकरणाला सरकारने गांभीर्याने घ्यावे अशी विनंती यावेळी नागरिकांनी केली. 

जोडे मारो आंदोलन 

जनआक्रोश मोर्चामध्ये नागरिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. नागरिकांनी कराडच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केल्याचे दिसून आले. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत नागरिक आंदोलनात आक्रमक झाले होते. कराडच्या फाशीसाठी आंदोलन सुरूच राहील. असा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला आहे. वाल्मिक कराडला अटक झाली आहे. परंतु त्याला तुरुंगात व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याच्या आरोपही नागरिकांनी यावेळी केला आहे. 

बिहारपेक्षा महाराष्ट्र वाईट झालाय 

बीडमध्ये कराडचे सहकारी 'बाप तो बाप होता है' असे स्टेटस ठेवू लागले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहेत. बीडमध्ये हे गुंड कंबरेला बंदूक लावून फिरत आहेत. ते बिहार एवढे वाईट नाही, तेवढा आता महाराष्ट्र वाईट झालाय. सरकारने यांची गुंडगिरी थांबवली पाहिजे. कराडसारख्या गुंडांमुळे सामान्य माणूसही अडचणीत आल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले आहे.    

टॅग्स :Puneपुणेagitationआंदोलनbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस