शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

अटलबिहारी वाजपेयी होते कांदेपोहे, पुरणपोळीचे चाहते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 00:07 IST

एखाद्या पदार्थाची चव इतकी स्मरणात राहते की तो स्वाद आणि त्यातील मिठास कधीच विसरू शकत नाही.. अटलबिहारी वाजपेयीदेखील त्याला अपवाद ठरले नाहीत...

पुणे - एखाद्या पदार्थाची चव इतकी स्मरणात राहते की तो स्वाद आणि त्यातील मिठास कधीच विसरू शकत नाही.. अटलबिहारी वाजपेयीदेखील त्याला अपवाद ठरले नाहीत... कारण पुण्यात आल्यावर ’श्रेयस’कडे त्यांची पावले वळली नाहीत, असे कधी झालेच नाही. इतके महाराष्ट्रीय पदार्थांच्या ते प्रेमात पडले होते.कै. बाळासाहेब चितळे आणि अटलजी नागपूरच्या संघाच्या तिसऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाला एकत्र होते... त्यापासून चितळे कुटुंबीयांशी त्यांचे ॠणानुबंध जुळले आहेत. १९८० ते १९९६ या कालावधीत संघासह विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते पुण्यात यायचे... त्या वेळी ते ‘श्रेयस’मध्येच उतरायचे.... कांदेपोहे, पुरणपोळीवर साजूक तूप, श्रीखंड आणि फुलके हे त्यांचे अत्यंत आवडीचे पदार्थ. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची पंच्याहत्तरी आणि संपदा बँकेच्या कार्यक्रमानिमित्त अटलजी पुण्यात आले होते. पण आयोजकांनी त्यांची राहण्याची व्यवस्था हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये केली होती. सकाळी सकाळी त्यांचा फोन आला की तातडीने मला कांदेपोहेचा डबा पाठव, तो डबा घेऊन त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांच्या खोलीबाहेर सुरक्षाव्यवस्था तैनात होती.कांदेपोहे हे शब्द त्यांच्या कानांवर पडताच त्यांनी मला लगेच आत बोलावले, असे श्रेयसचे मालक दत्ता चितळे अभिमानाने सांगत होते. १९८४ मध्ये पुण्यातच ‘श्रेयस’च्या हॉलमध्ये भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व नेत्यांचे वास्तव्य श्रेयसमध्येच होते.अत्यंत साधी राहणी आणि अर्थपूर्ण व मार्मिक शैलीमध्ये भाष्य ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. या कार्यकारिणीच्या शेवटच्या बैठकीत त्यांचे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर भाषण झाले. मात्र, मी पोहोचण्यापूर्वीच ते मुंबईला गेले. हॉटेलमधून निघताना त्यांनी श्रेयसबद्दल अभिप्राय लिहून ठेवला. त्यामध्ये ‘श्रेयस ने प्रेयस का रूप लिया है’’ असा उल्लेख त्यांनी केला... तो कागद आम्ही जपून ठेवला आहे.एकदा असेच पुण्यातील सभेमधले भाषण संपल्यानंतर त्यांना श्रेयसवर घेऊन चाललो होतो. आमची गाडी बालगंधर्व रंगमंदिराजवळ आल्यावर ‘इधर कौनसा नाटक चल रहा है, चलो हम देखेंगे’ त्यांना राजकारणातून काहीसा विरंगुळा हवा होता. परंतु त्या वेळी रात्रीचे ११ वाजले असल्याने शक्य नव्हते. नाटक, चित्रपटांचे ते चाहते होते... त्यामुळे ते हॉटेलवर असताना काही मराठी चित्रपट आम्ही त्यांना आवर्जून दाखवायचो.‘एक डाव भुताचा’ हा चित्रपट त्यांनी पाहिला होता. मात्र १९९६ नंतर पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे पुण्यात येणे कमी झाले... अशा आठवणींना चितळे यांनी उजाळा दिला.पुण्यातच १९५२ साली जनसंघाची स्थापना झाली होती. त्या कार्यक्रमाला अटलजी आले होते. प्रभात चित्रपटगृहात कार्यक्रम संपल्यानंतर बाबुराव किवळकरांच्या घरी त्यांच्याबरोबर जात असताना हिंदविजयजवळ रिक्षा बंद पडली. दोघेही उतरले. अटलजींच्या पायाला काहीतरी दुखापत झाली होती. दुसरी रिक्षा मिळाली नाही. बाबुरावांच्या खांद्यावर हात ठेवत कसेबसे चालत ते घरी पोहोचले. बाबुरावांच्या आईंनी दोघांनाही पाटावर बसवून गरम गरम भाकरी चुलीवर शेकवून वाढल्या... अशा अनेक अटलजींच्या स्मृती मनामध्ये ताज्या असल्याचे चितळे यांनी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPuneपुणे