शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

आताच निवडणुका झाल्यास भाजपला ६० जागाही मिळणे कठीण : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 10:20 IST

सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले...

पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आताच निवडणुका घेतल्यास विधानसभेत भाजपचे ६० पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, असे भाकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटक निकालामुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लवकर होईल, याविषयी शंका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, राज्यात ध्रुवीकरण होणार नाही. लोकांना विकास हवा आहे. महागाई कमी करणारे निर्णय हवे. देशात सध्या जे सुरू आहे, ते नागरिकांना मान्य नाही. त्यामुळे एकहाती सत्ता दिली. मात्र, त्याचा योग्य वापर करीत नाही, हे स्पष्ट होत आहे. राज्यात सध्या निवडणुका घेतल्यास भाजपला ३५ टक्क्यांपेक्षा जास्त मते पडणार नाहीत, असे मी विश्वासपूर्वक सांगतो. त्याचप्रमाणे दंगली नियंत्रण करता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे, असा आरोपही त्यांनी केला.

‘ईडी’ला सामोरे जाणार

‘ईडी’ची नोटीस आली आहे. येत्या २२ तारखेला चौकशीला सामोरे जाणार आहे; पण ज्या कंपनीशी काहीच संबंध नाही. त्यांनी नोटीस का पाठविली आहे, त्याची माहिती घेत आहे. मात्र, एजन्सीला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस