शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आताच निवडणुका झाल्यास भाजपला ६० जागाही मिळणे कठीण : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 10:20 IST

सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले...

पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आताच निवडणुका घेतल्यास विधानसभेत भाजपचे ६० पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, असे भाकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटक निकालामुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लवकर होईल, याविषयी शंका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा झालेली नाही. सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, राज्यात ध्रुवीकरण होणार नाही. लोकांना विकास हवा आहे. महागाई कमी करणारे निर्णय हवे. देशात सध्या जे सुरू आहे, ते नागरिकांना मान्य नाही. त्यामुळे एकहाती सत्ता दिली. मात्र, त्याचा योग्य वापर करीत नाही, हे स्पष्ट होत आहे. राज्यात सध्या निवडणुका घेतल्यास भाजपला ३५ टक्क्यांपेक्षा जास्त मते पडणार नाहीत, असे मी विश्वासपूर्वक सांगतो. त्याचप्रमाणे दंगली नियंत्रण करता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे, असा आरोपही त्यांनी केला.

‘ईडी’ला सामोरे जाणार

‘ईडी’ची नोटीस आली आहे. येत्या २२ तारखेला चौकशीला सामोरे जाणार आहे; पण ज्या कंपनीशी काहीच संबंध नाही. त्यांनी नोटीस का पाठविली आहे, त्याची माहिती घेत आहे. मात्र, एजन्सीला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस