शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावा’ जयंत पाटलांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 09:08 IST

वॉर्डरचना कशीही झाली तरी आम्ही घाबरत नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले....

पुणे : तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीच वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री असताना तेच पूर्वीच्या रचनेला विरोध करत आहेत. महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. निवडणुका लवकर घेऊन सोक्षमोक्ष लावावा. आपले पाप आपल्याच पारड्यात पडेल याची भीती आहे. त्यामुळे वॉर्डरचना कशीही झाली तरी आम्ही घाबरत नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

शहर राष्ट्रवादीच्या २१ कार्यकारिणीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, दीपाली धुमाळ, अश्विनी कदम, मृणालिनी वाणी, नीलेश कदम आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘कर्नाटक विधानसभेचा निकाल पाहता आगामी महापालिका निवडणुका लवकर घेतील, याचे धाडस हे सरकार करणार नाही. दलबदल, पक्षबदल केलेल्यांचा तेथे पराभव झाला आहे. राज्यातही तीच स्थिती राहणार आहे. त्यांच्याकडील नेते कधी आपल्याकडे येतील, हेही त्यांना कळणार नाही.

दरम्यान, बूथ कमिटीचे महत्त्व सांगत पाटील यांनी तत्काळ बूथ कमिटीच्या नियुक्त्या पूर्ण करा. सर्व शाखांनी एकत्र बसून एक जूनपर्यंत बूथ अध्यक्ष नेमावेत. वॉर्डनिहाय बैठका घ्याव्यात. पक्षाला मानणाऱ्या नागरिकांकडून त्यांची मते जाणून घ्यावीत. देशातील प्रश्नांबाबत चर्चा करावी. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम वाॅर्डावाॅर्डांत राबवा, पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

ज्या पक्षात चर्चा विनिमय होते, तो पक्ष वैचारिकदृष्ट्या भक्कम असतो, असेही पाटील म्हणाले. पुणे शहरात राष्ट्रवादी मोठा पक्ष म्हणून निवडून येईल, अशी खात्री आहे. पालिकेत चांगला कारभार करायची भाजपला संधी देऊन झाली आहे. आता पुणेकर राष्ट्रवादीला पूर्ण बहुमताने संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नार्वेकर आपले जावई :

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. ‘रिझनेबल’ मुदतीत हा निर्णय घ्यायचा आहे. विधानसभा अध्यक्ष न्याय व्यवस्था धाब्यावर बसवतील, असे वाटत नाही. तसेच, नार्वेकर हे आपले जावई आहेत. त्यांनी आपल्याकडून लोकसभा, विधानसभा लढवली आहे. ते आपल्या सद्भावनांची दाखल घेतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र