शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईला धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 19:50 IST

मागील आंदोलनवेळी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केली होती, आता आम्ही कुणाच्याही सांगण्यावरुन थांबणार नाही असे पाटलांनी स्पष्ट सांगितले

आळंदी : मराठा समाज आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला जरांगे पाटलांचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहे. आझाद मैदानावर हा मोर्चा जाणार असून पहिल्या मोर्चाच्या तुलनेत पाचपटीने अधिक मराठा समाज या मोर्चात सहभागी होणार आहे. मात्र यावेळी मराठा आरक्षण भेटल्याशिवाय ''मुंबई सोडणार नाही'' असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.          खेड तालुक्यातील चिंबळी येथे आयोजित बैठकीत जरांगे पाटील बोलत होते. याप्रसंगी विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या मोर्च्याची रणनीती ठरविण्यात आली. मागील वेळी मराठा समाजाचा मोर्चा लोणावळा मार्गे मुंबईला नेण्यात आला होता. परंतु यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट मार्गे कल्याण - ठाणे चेंबुरवरुन आझाद मैदानावर जाईल. मागील आंदोलनवेळी मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत मराठा समाज आरक्षणावर तोडगा निघाला नाही. आता आम्ही कुणाच्याही सांगण्यावरुन थांबणार नाही असेही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले.

 माळशेज घाटातुन खाली उतरल्यावर मराठा समाजाचा हा मोर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातुन जाणार आहे.  याबाबत विचारलं असता जरांगेंनी आम्ही निस्वार्थी भावनेने पुढे जातोय कल्याण मार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडला असल्याचे सांगितले. त्यातच मराठा आणि धनगर वेगळा नसुन एकच असल्याने त्या समाजानेही जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या आगामी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

दोन भावांनी एकत्र यावं... 

दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही. जुनी म्हण आहे कि "मुंबई पाहिजे तर ठाकरे पाहिजे". कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं. पण कशासाठी म्हणत होते हे माहिती नाही असा टोला त्यांनी लागवला. दरम्यान राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत. मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा... 

संजय शिरसाटांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा जात प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी रोखण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. मला मिळालेली माहिती खरी असुन असले चाळे बंद करा. प्रमाणपत्र रोखुन धरु नका. अन्यथा वेळ वाईट येईल असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीMumbaiमुंबई