शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काँग्रेसची जनसंघर्ष रथयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 2:46 AM

अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन : जनतेच्या हितासाठी यात्रा

पुणे : केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या चार वर्षांच्या अपयशी कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनतेच्या हितासाठी जनसंघर्ष यात्रेस सुरुवात झाली आहे. गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते जनसंघर्ष रथाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पुणे शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, आमदार अमर राजूरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड, अभय छाजेड, गटनेते अरविंद शिंदे, रोहित टिळक, नीता रजपूत, नगरसेवक आबा बागुल, रवींद्र घेणेकर, मनीष आनंद, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवार (३१) पासून कोल्हापूर येथून सुरू होणार आहे. या यात्रेस लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत. याबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी होणार आहेत.६ सप्टेंबर रोजी जनसंघर्ष यात्रेचे रथ पुणे शहरातील पर्वती, कसबा, शिवाजीनगर, कँन्टॉन्मेंट व हडपसर या मतदार संघात जाणार आहे. ७ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे जाहीर सभा होणार असून ८ सप्टेंबर रोजी या यात्रेचा समारोप सभा पुण्यात होणार आहे.नक्षलवादाच्या नावाखाली सुरू असलेली धरपकड सनातन संस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी केली जात असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात सरकार कठोर कारवाई का करत नाही, असा सवालही त्यांनी केला. भिडे यांना कुठल्याही चौकशीविना मुख्यमंत्री क्लीन चिट देतात हे कशाचं लक्षण आहे, या उलट सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणाऱ्या विचारवंतांची मात्र धरपकड केली जातेय. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणे