शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'इथे कधीच होणार नाही', तीर्थक्षेत्र आळंदीलगतचे कत्तलखाना आरक्षण रद्द करू - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:13 IST

तपोवन आश्रम असणाऱ्या पवित्र स्थळी कत्तलखाना उभारण्याचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म, अध्यात्म व परंपरेवर थेट हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे

आळंदी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत जे आरक्षण आहे, ते आम्ही रद्द करू. कत्तलखाना इथे कधीच होणार नाही असा शब्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. तीर्थक्षेत्र आळंदीत ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळा आणि गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा उद्योग मंत्री उदय सामंत हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

मराठी भाषेचा मंत्री झाल्यापासून सहा महिन्यांत तीनदा आळंदीला आलो आहे. ज्ञानेश्वरी ही सर्वसामान्यांच्या हातात पोहोचली पाहिजे, अशी लोकांची मागणी होती. त्यानुसार, पुढच्या आठ तासांत ज्ञानेश्वरीची छपाई करण्याचा निर्णय घेतल्याचं मी नमूद केलं. इतर क्षेत्रांप्रमाणेच वारकरी पंथातही पद्म पुरस्कार दिला पाहिजे, असं मत व्यक्त करत लवकरच गुरुवर्य शांतीब्रह्म मारोतीबाबा महाराज कुरेकर यांना 'पद्म पुरस्कार' मिळण्याची शिफारस करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र आळंदी लगत असणाऱ्या मोशी - डुडुळगाव परिसरात पिंपरी - चिंचवड महापालिकेने चार एकर जागेवर कत्तलखाना उभारण्यासाठी जागा आरक्षित केली आहे. या धक्कादायक निर्णयामुळे संपूर्ण हिंदू समाज, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या परिसरात राम मंदिर अयोध्याचे कोषाध्यक्ष पूज्य गोविंददेव गिरी महाराज यांचा वेदव्यास 'तपोवन' आश्रम असून हजारो विद्यार्थी त्याठिकाणी वेदिक शिक्षण घेत आहेत. अशा पवित्र स्थळी कत्तलखाना उभारण्याचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म, अध्यात्म व परंपरेवर थेट हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणHinduहिंदूTempleमंदिर