शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाकडे कौशल्य आहे हे कळून येईल; अजितदादांचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:57 IST

राज्यसभेच्या अनुभवातून तिन्ही पक्ष बरच काही शिकतील

बारामती : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये जे झालं याबाबत विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्ही काळजी घेऊ. राज्यसभेच्या अनुभवातून तिन्ही पक्ष बरच काही शिकतील. विधान परिषद निवडणुकीमध्ये अधिक चांगला निकाल कसा येईल हे पाहिले जाईल. या निवडणुकीच्या माध्यमातून कोणाकडे कौशल्य आहे आणि नाही हे सुद्धा कळून येईल,  असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना दिला.

बारामती येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केले. ते पुढे म्हणाले, दिनांक १८, १९, २० तीन दिवस सर्व आमदार मुंबईमध्ये थांबतील, अशी मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. आम्ही सुद्धा आज मुंबईमध्ये जात आहोत. सर्व आमदारांना त्या ठिकाणी बोलावले आहे, अशी माहिती दिली. महाविकासआघाडी मधील काही आमदार नाराज असल्याची सध्या चर्चा आहे, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वांचीच शंभर टक्के कामे होत नसतात सत्तेत असणारा आमदार आपली कामे पुढे नेत असतो त्यामध्ये गैर काहीच नाही.  भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'अजित दादा स्पष्टवक्ते आहेत त्यांनी आमच्या सोबत येऊन सरकार स्थापन करावे' अशी खुली ऑफर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती, यावर माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता, कुणी काही बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही जेथे आहोत त्या ठिकाणी आमचं बरं चालले आहे, असे उत्तर दिले. ओबीसी जनगणने बाबत आज सायंकाळी सहा वाजता बैठक होणार आहे. समान आडनावामुळे ही जनगणना कशा पद्धतीने करता येईल याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठक नुकतीच मुंबई येथे झाली आहे. घटनेनुसार राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च  संविधानीक पद असल्याने या पदाचा व सर्वसामान्य जनतेचा संपर्क कमी होतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तिच आमच्या पक्षाची देखील भूमिका होती. आज पर्यंत पवार साहेब सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करत आले आहेत. त्यामध्ये त्यांना समाधान मिळते, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.'' 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण