शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

.....तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 13:53 IST

दोन्ही महापालिकांनी त्यांना मंजूर असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरले नाही तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य आहे.

ठळक मुद्देपीएमआरडीएतर्फे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी टीपी स्किमची निर्मिती पीएमआरडीएने सध्या केवळ पाच टीएमसी पाण्याची केली मागणी

 पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापरले जात असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेले पाणी सोडण्यास अडचणी येत आहेत. त्यातच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सिंचन विभागाकडे पाच टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. परंतु, दोन्ही महापालिकांनी त्यांना मंजूर असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरले नाही तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य आहे.पीएमआरडीएतर्फे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी टीपी स्किम तयार केल्या जात आहेत. मात्र, या टीपी स्किमला पाणी कुठे उपलब्ध करून देणार असा प्रश्न पीएमआरडीएसमोर आहे. पाण्याची व्यवस्था केल्याशिवाय टीपी स्किमला मान्यता मिळत नाही. त्यामुळे पीएमआरडीएने सिंचन विभागाकडे पाण्याची मागणी केली. परंतु, धरणात पाणी शिल्लक राहत नसल्यामुळे पीएमआरडीएला पाणी देता येणार नसल्याचे सिंचन विभागाने स्पष्ट केले. पीएमआरडीएचे क्षेत्र दोन्ही महापालिकांपेक्षा अधिक असूनही पीएमआरडीएने सध्या केवळ पाच टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. सर्वांनी नियमाप्रमाणे पाणी वापरले तर खडवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातूनच दोन्ही पालिका, पीएमआरडीएला आणि शेतीला पाणी देणे शक्य आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल कालवा समितीसमोर सादर केला आहे.पुणे विभागाचे अक्षक अभियंता संजीव चोपडे, पुणे महापालिकेची लोकसंख्या सुमारे ३९ लाख असून पिंपरी चिंचवडची लोकसंख्या सुमारे २२ लाख आहे.लोकसंख्येनुसार पुणे महापालिकेसाठी सुमारे ८.५० टीएमसी तर पिंपरी चिंचवडने सुमारे ४.५० टीएमसी पाणी वापरणे अपेक्षित आहे. नियमानुसार दोन्ही पालिकांच्या वाटाल्या १२.५० ते १३.०० टीएमसी पाणी येते. मात्र, या दोन्ही पालिकांमधील ६१ लाख लोकांकडून सव्वा कोटी लोकसंख्येचे पाणी वापरले जाते. परिणामी दोन्ही पालिकांकडून क्षमतेपेक्षा दुप्पट पाण्याचा वापर केला जात आहे..........................पालिकेने केले दुर्लक्षदोन्ही पालिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून क्षमतेपेक्षा अधिकच पाणी वापरले जाते. मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड पालिकेने टप्प्याटप्प्याने आपला पाण्याचा वापर कमी करावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यात पाण्याच्या चोरीला लगाम घालणे, पाण्याची गळती थांबवणे, कालव्याऐवजी थेट धरणातून पाणी उचलणे अपेक्षित आहे. परंतु, पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएWaterपाणीKiran Gitteकिरण गित्तेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका