न्यायालयात न्याय मिळतो, असे नव्हे! वकिलीचा झाला व्यापार: न्या. धनंजय चंद्रचूड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 05:58 AM2022-08-20T05:58:16+5:302022-08-20T05:58:51+5:30

मध्यस्थ म्हणून कायदा जाणणाऱ्या लोकांबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सुबुद्ध नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

It is not that the court gets justice! Lawyer's trade: Justice. Dhananjay Chandrachud | न्यायालयात न्याय मिळतो, असे नव्हे! वकिलीचा झाला व्यापार: न्या. धनंजय चंद्रचूड

न्यायालयात न्याय मिळतो, असे नव्हे! वकिलीचा झाला व्यापार: न्या. धनंजय चंद्रचूड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : न्यायालयात जाऊनच न्याय मिळतो, असे नाही. तर सामाजिक प्रक्रियेतूनही प्रश्न सुटू शकतात. मध्यस्थ म्हणून कायदा जाणणाऱ्या लोकांबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सुबुद्ध नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी व्यक्त केले. इंडियन लॉ सोसायटीच्या (आयएलएस) शताब्दीनिमित्त ‘देशात मध्यस्थाचे भवितव्य’ या विषयावरील व्याख्यानात न्यायमूर्ती चंद्रचूड बोलत होते.  

इंडियन लॉ सोसायटीज् सेंटर फॉर आर्बिट्रेशन अँड मिडिएशनचे (इल्स्का) उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर, उपाध्यक्ष पी. व्ही. करंदीकर, प्राचार्य वैजयंती जोशी, संचालक सत्या नारायण उपस्थित होते.

देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये ४ कोटी, उच्च न्यायालयांमध्ये १ कोटी आणि सर्वोच्च न्यायालयात ७२ हजार खटले अजूनही प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या नेहमीच्या प्रक्रियेतून हे खटले लवकर मार्गी लागणे शक्य आहे असे वाटत नाही, असे सांगून न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, आपल्या समाजाची रचना विषम असल्याने त्यांच्याकडील साधनेही विषम आहेत. मालक आणि कामगार, घरमालक आणि भाडेकरू किंवा अगदी पती-पत्नी यांच्यातील एक पक्ष नेहमीच अशक्त ठरू शकतो. व्यावसायिक भागीदार आणि पती-पत्नी यांच्यात विसंवाद होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. अशा वेळी मध्यस्थ गरजेचा असतो. तसेच  न्यायालयीन मध्यस्थाची भूमिका वठवताना आपली कृती ही राज्यघटनेशी सुसंगत अशीच  असली पाहिजे. घटनाबाह्य वर्तन घडणार नाही, याची काळजी देखील घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वकिलीचा झाला व्यापार

अलीकडच्या काळात वकिली क्षेत्राचे रुपांतर व्यवसायाकडून व्यापाराकडे झाले आहे. न्यायदानाच्या क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता जपली पाहिजे. वकील, न्यायाधीश, न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ यांनी सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेत कायदा सांगितला पाहिजे. याकडेही  चंद्रचूड यांनी लक्ष वेधले.
 

Web Title: It is not that the court gets justice! Lawyer's trade: Justice. Dhananjay Chandrachud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे