शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

VidhaSabha 2019 : पुण्यात आघाडीसाठी ‘पर्वती’ ठरणार कळीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:14 IST

काँग्रेसचा पर्वती मतदार संघासह चार जागांसाठी आग्रह असून, आघाडीच्या पुण्यातील जागा वाटपामध्ये ‘पर्वती’ कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसची चार जागांची मागणी; कोथरूडमधून राष्ट्रवादीचा पळ; मनसे लढवण्याची शक्यता 

पुणे : पुण्यातील आठ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती, खडकवासला, वडगावशेरी आणि हडपसर या चार जागा लढविणार असल्याचे आणि काँग्रेसला शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेन्ट या तीन जागा व मित्र पक्षासाठी कोथरूड मतदारसंघ सोडल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (दि. २२) पुण्यात केली. परंतु काँग्रेसचा पर्वती मतदार संघासह चार जागांसाठी आग्रह असून, आघाडीच्या पुण्यातील जागा वाटपामध्ये ‘पर्वती’ कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहेत. तर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा मित्र पक्षाला सोडत येथून पळ काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.विधानसभा निवडणूक जाहीर होताच आघाडी-युतीच्या जागा वाटपांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील काही जागा सोडल्या तर बहुतेक सर्व जागांबाबत अंतिम निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. तर भाजप-सेनेच्या जागा वाटपाचा घोळ अद्यापही सुरूच आहे. यामुळेच अजित पवार यांनी रविवारी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पुण्यातील आठही जागा वाटपाचा निर्णय झाल्याचे घोषित करत उमेदवार कोणी असो पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्याचे आदेश दिले. अजित पवार यांच्या घोषणेनंतर मात्र आघाडीतील काही मतदारसंघांतील तीव्र इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. दरम्यान, कोथरूड मतदारसंघ सध्या सत्ताधारी भाजपचा सर्वांत मजबूत बालेकिल्ला समजला जातो. आघाडीमध्ये आतापर्यंत कोथरूड मतदारसंघावर राष्ट्रवादी काँगे्रसचा दावा होता. सन २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा जोशी यांनी ही जागा लढवली, तर सन २०१४ मध्ये बाबूराव चांदेरे यांनी राष्ट्रवादी काँगे्रसकडून निवडणूक लढवली व काँगे्रसच्याउमेदवारापेक्षा अधिक मते मिळवली. परंतु यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रस दोन्ही पक्षांनी कोथरूडमधून पळ काढला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हडपसर मतदारसंघ राष्टÑवादीने आपल्याकडे ठेवला आहे. परंतु, कॉँग्रेसच्या इच्छुकांना हा मतदारसंघ त्यांच्याकडे हवा आहे. त्यामुळे या जागेवरूनदेखील रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. ...........

२००९ मध्ये राष्ट्रवादीने लढवली होती जागा४पर्वती मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी गेल्या काही वर्षांपासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मेळावे, विविध विकासकामांची उद्घाटने, फ्लेक्स, बॅनरबाजी सुरू आहे. यामुळेच काँग्रेसने पर्वती मतदारसंघावर दावा केला आहे. परंतु सन २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसने आघाडीमध्ये ही जागा लढवली होती. ..........

सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली. परंतु येथे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवाराला अधिक मते मिळाल्याने आता राष्ट्रवादीने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. 

४तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष सुभाष जगताप आणि अश्विनी कदम व त्यांचे पती नितीन कदम यांनी देखील पर्वती मतदारसंघासाठी जोरदार तयारी केली आहे. यामुळे आघाडीच्या जागावाटपामध्ये पर्वती मतदारसंघातील दोन्ही पक्षांतील तीव्र इच्छुक उमेदवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...............अद्याप जागा वाटपाबाबत निर्णय नाहीपुण्यातील आठ जागांबाबत राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी घोषणा केली असली तरी काँगे्रसच्या हाय कामांडकडून अद्याप कोणताही निरोप किंवा आदेश आम्हाला आलेला नाही. याबाबत येत्या दोन दिवसांत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुण्यातील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होईल. काँगे्रसतर्फे पुण्यातील आठपैकी पर्वती, शिवाजीनगर, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेन्ट या चार जागांची मागणी करण्यात आली आहे. - रमेश बागवे, काँगे्रस शहराध्यक्ष

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसElectionनिवडणूक