शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

‘इश्क तौफीक है गुनाह नहीं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आधुनिक युगात जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य समाजाने मान्य करणे आवश्यक आहे. मात्र सध्या आंतरधर्मीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आधुनिक युगात जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य समाजाने मान्य करणे आवश्यक आहे. मात्र सध्या आंतरधर्मीय विवाहाविरोधात काही राज्ये कायदे करत आहेत आणि इतर राज्यातील नेते मंडळी त्यावर कोणतेही मत व्यक्त करीत नाहीत. ही गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्य ही याबाबत उदासीन आहे, अशी खंत ज्येष्ठ लेखक संजय पवार यांनी व्यक्त केली. खरंतर ‘इश्क तौफीक (सामर्थ्य) है गुनाह नही’ असे फिराक गोरखपुरी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात प्रेमातील सामर्थ्य काय ते अनुभवायला मिळाले.

एस. एम. जोशी फाउंडेशन येथे व्हॅलेंटाइन्स डे निमित्त आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह अथवा प्रेमविवाह केलेल्या व्यक्तींचा स्नेहमेळावा रविवारी (दि.१४) आयोजिला होता. भारतीय राज्यघटना, जोडीदार निवडीचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्क या अनुषंगाने प्रबोधन आणि व्यापक मंच उभारणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. मेळाव्याची सुरुवात सर्वांनी केक कापून आणि एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन केली.

या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्त्या विद्या कुलकर्णी, प्रा. विपुला अभ्यंकर, कामगार नेते अजित अभ्यंकर, जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे तसेच अॅड. विशाल जाधव, अनिल हवालदार, अॅड. मीना जाधव, आर्किटेक्ट तृप्ती अनिल हवालदार आदी उपस्थित होते.

संजय पवार म्हणाले, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न केलेल्या व्यक्तींना तुटपुंजी आर्थिक मदत न करता त्यांची निकडीची गरज म्हणून त्यांना म्हाडामध्ये व इतर योजनांमध्ये घरे दिली पाहिजेत. त्यांना शिक्षण, नोकरी, बँककर्जे यासाठी मदत दिली पाहिजे.

विद्या कुलकर्णी म्हणाल्या, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय प्रेमविवाहाचे प्रमाण कमी असून, त्या तुलनेत अरेंज मॅरेजचे प्रमाण अधिक आहे. दोघांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण तर होते, पण लग्नापर्यंत हे नाते पुढे न्यायचे का? ही गोष्ट त्यांच्यासाठी अडचण ठरते. कुटुंबाकडून कायद्याचा होणारा गैरवापर, जातपंचायतीचा हस्तक्षेप, सरकारी पातळीवर धोरण नसणे या गोष्टी देखील विरोधाला कारणीभूत आहेत.

विपुला अभ्यंकर यांनी ४३ वर्षांपूर्वी केलेल्या आंतरधर्मीय प्रेमविवाहाचा अनुभव सांगितला. मी जैन कुटुंबातून आलेले होते. कुटुंबाची काहीशी संकुचित विचारसरणी होती. मी कुटुंबाला सांगण्याचे धाडस करू शकले नाही असे त्या म्हणाल्या.

किरण मोघे यांनीही त्यांचा अनुभव कथन केला. माझ्या बहिणींनी स्वजातीत प्रेम विवाह केला. पण मी आंतरजातीय विवाह केला. तेव्हा सर्वांना धक्का बसला. मला विरोध होईल असं वाटलं नव्हतं पण नकळतपणे विरोध झाला. खरंतर हा जातीसमूहांचा विरोध असतो, तर तो विचारांचा विरोध असतो. एका टप्प्यावर तणाव असतो तो नात्यात येऊ नये याकरिता जोडप्यांना प्रयत्न करावा लागतो.

---------------------------------------------

आंतरजातीय-आंतरधर्मीय आणि प्रेम विवाह करणा-यांसाठी मदत म्हणून सपोर्ट ग्रुप तयार करण्यासाठी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह अभ्यास अभ्यास मंचाची स्थापना केली आहे. हा सपोर्ट ग्रुप सुरुवातीला महाराष्ट्रात काम करेल. त्यानंतर भारतभर त्याचा विस्तार केला जाईल. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करण्याचा विचार आहे.

-अॅड. विशाल जाधव, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह अभ्यास अभ्यास मंच

----------------------------------------------------