शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने केली जातात - अभय छाजेड

By राजू इनामदार | Updated: December 7, 2023 18:34 IST

देशाचे भाग्यविधाते असलेल्या पंडित नेहरू यांनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे

पुणे: इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने कशी केली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर व पंडित नेहरू यांच्यासंदर्भात केलेले विधान होय अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी केली. देशाचे भाग्यविधाते असलेल्या पंडित नेहरू यांनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे, मात्र नेहरूंवर प्रेम करणारा एकही भारतीय यावर कधी विश्वास ठेवणार नाही असे त्यांनी सांगितले.

ॲड. छाजेड म्हणाले, घो़डचूक झाली असलीच तर ती याप्रकारात जम्मू काश्मिरचे तत्कालीन सस्थांनिक राजा हरिसिंग यांची आहे. त्यांनी स्वतंत्र भारतात सहभागी होण्यास विलंब लावला. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून रहायचे होते. महात्मा गांधीजींनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बधले नाही. दरम्यान पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मिरवर आक्रमण केले, त्यावेळी हरिसिंग यांना जाग आली व त्यांना पंडित नेहरूंकडे लष्करी साह्य मागितले. स्वत: गांधीजींनी या लष्करी मदतीला अनुमती दिली. मात्र हरिसिंग यांनी हट्टाने ३७० कलमांची निर्मिती करून घेतली. काश्मिर भारतातच घ्यायचे असल्याने ते मान्य करण्याशिवाय त्यावेळी गत्यंतर नव्हते.

हरिसिंग यांच्या विनंतीवरून लष्करी साह्य केले गेले, टोळीवाल्यांना हाकलून देण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले, मात्र त्याचवेळी युनोने युद्धविराम केल्याचे घोषित केले व टोळीवाल्यांनी ताब्यात घेतलेला काश्मिरचा भाग पाकव्याप्त काश्मिर झाला, उर्वरित भाग भारतातच राहिला. नेहरू त्यावेळी पंतप्रधान म्हणून अनेक आघाड्यांवर संघर्ष करत होते. देशातील ५०० पेक्षा जास्त संस्थाने विलिन करून घ्यायची होती, त्यामुळे त्यांच्या कलाने घेतले जाण्याची गरज लक्षात घेऊन त्यावेळी निर्णय झाले. केंद्रीय गृहमंत्री असलेल्या शाह यांची अभ्यास करून व्यक्त होण्याची ख्याती नाही. तसेच त्यावेळच्या संघर्षात त्यांच्या विचारधारेचे लोक कुठेही नव्हते. त्यामुळे त्यांना या इतिहासाची माहिती असणेही शक्य नाही. यासाठीच त्यांनी अभ्यास करून नंतरच बोलावे अशी टीका छाजेड यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेAbhay Chajedअभय छाजेडcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाहBJPभाजपा