शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने केली जातात - अभय छाजेड

By राजू इनामदार | Updated: December 7, 2023 18:34 IST

देशाचे भाग्यविधाते असलेल्या पंडित नेहरू यांनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे

पुणे: इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने कशी केली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर व पंडित नेहरू यांच्यासंदर्भात केलेले विधान होय अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी केली. देशाचे भाग्यविधाते असलेल्या पंडित नेहरू यांनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे, मात्र नेहरूंवर प्रेम करणारा एकही भारतीय यावर कधी विश्वास ठेवणार नाही असे त्यांनी सांगितले.

ॲड. छाजेड म्हणाले, घो़डचूक झाली असलीच तर ती याप्रकारात जम्मू काश्मिरचे तत्कालीन सस्थांनिक राजा हरिसिंग यांची आहे. त्यांनी स्वतंत्र भारतात सहभागी होण्यास विलंब लावला. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून रहायचे होते. महात्मा गांधीजींनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बधले नाही. दरम्यान पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मिरवर आक्रमण केले, त्यावेळी हरिसिंग यांना जाग आली व त्यांना पंडित नेहरूंकडे लष्करी साह्य मागितले. स्वत: गांधीजींनी या लष्करी मदतीला अनुमती दिली. मात्र हरिसिंग यांनी हट्टाने ३७० कलमांची निर्मिती करून घेतली. काश्मिर भारतातच घ्यायचे असल्याने ते मान्य करण्याशिवाय त्यावेळी गत्यंतर नव्हते.

हरिसिंग यांच्या विनंतीवरून लष्करी साह्य केले गेले, टोळीवाल्यांना हाकलून देण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले, मात्र त्याचवेळी युनोने युद्धविराम केल्याचे घोषित केले व टोळीवाल्यांनी ताब्यात घेतलेला काश्मिरचा भाग पाकव्याप्त काश्मिर झाला, उर्वरित भाग भारतातच राहिला. नेहरू त्यावेळी पंतप्रधान म्हणून अनेक आघाड्यांवर संघर्ष करत होते. देशातील ५०० पेक्षा जास्त संस्थाने विलिन करून घ्यायची होती, त्यामुळे त्यांच्या कलाने घेतले जाण्याची गरज लक्षात घेऊन त्यावेळी निर्णय झाले. केंद्रीय गृहमंत्री असलेल्या शाह यांची अभ्यास करून व्यक्त होण्याची ख्याती नाही. तसेच त्यावेळच्या संघर्षात त्यांच्या विचारधारेचे लोक कुठेही नव्हते. त्यामुळे त्यांना या इतिहासाची माहिती असणेही शक्य नाही. यासाठीच त्यांनी अभ्यास करून नंतरच बोलावे अशी टीका छाजेड यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेAbhay Chajedअभय छाजेडcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाहBJPभाजपा