शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने केली जातात - अभय छाजेड

By राजू इनामदार | Updated: December 7, 2023 18:34 IST

देशाचे भाग्यविधाते असलेल्या पंडित नेहरू यांनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे

पुणे: इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने कशी केली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर व पंडित नेहरू यांच्यासंदर्भात केलेले विधान होय अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी केली. देशाचे भाग्यविधाते असलेल्या पंडित नेहरू यांनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे, मात्र नेहरूंवर प्रेम करणारा एकही भारतीय यावर कधी विश्वास ठेवणार नाही असे त्यांनी सांगितले.

ॲड. छाजेड म्हणाले, घो़डचूक झाली असलीच तर ती याप्रकारात जम्मू काश्मिरचे तत्कालीन सस्थांनिक राजा हरिसिंग यांची आहे. त्यांनी स्वतंत्र भारतात सहभागी होण्यास विलंब लावला. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून रहायचे होते. महात्मा गांधीजींनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बधले नाही. दरम्यान पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मिरवर आक्रमण केले, त्यावेळी हरिसिंग यांना जाग आली व त्यांना पंडित नेहरूंकडे लष्करी साह्य मागितले. स्वत: गांधीजींनी या लष्करी मदतीला अनुमती दिली. मात्र हरिसिंग यांनी हट्टाने ३७० कलमांची निर्मिती करून घेतली. काश्मिर भारतातच घ्यायचे असल्याने ते मान्य करण्याशिवाय त्यावेळी गत्यंतर नव्हते.

हरिसिंग यांच्या विनंतीवरून लष्करी साह्य केले गेले, टोळीवाल्यांना हाकलून देण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले, मात्र त्याचवेळी युनोने युद्धविराम केल्याचे घोषित केले व टोळीवाल्यांनी ताब्यात घेतलेला काश्मिरचा भाग पाकव्याप्त काश्मिर झाला, उर्वरित भाग भारतातच राहिला. नेहरू त्यावेळी पंतप्रधान म्हणून अनेक आघाड्यांवर संघर्ष करत होते. देशातील ५०० पेक्षा जास्त संस्थाने विलिन करून घ्यायची होती, त्यामुळे त्यांच्या कलाने घेतले जाण्याची गरज लक्षात घेऊन त्यावेळी निर्णय झाले. केंद्रीय गृहमंत्री असलेल्या शाह यांची अभ्यास करून व्यक्त होण्याची ख्याती नाही. तसेच त्यावेळच्या संघर्षात त्यांच्या विचारधारेचे लोक कुठेही नव्हते. त्यामुळे त्यांना या इतिहासाची माहिती असणेही शक्य नाही. यासाठीच त्यांनी अभ्यास करून नंतरच बोलावे अशी टीका छाजेड यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेAbhay Chajedअभय छाजेडcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाहBJPभाजपा