शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विद्यापीठ फंडातील भरतीमध्ये अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 9:15 PM

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये जाहिरात न देता त्याचबरोबर योग्य ती प्रक्रिया न पार पाडता कुठलीही पदे भरली जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : जाहिरात न देता थेट भरतीराज्य शासनाकडून भरती होत नसल्याने विद्यापीठ स्तरावर कंत्राटी पध्दतीने १५७ पदे निर्माण मुदत संपल्यानंतर पुन्हा जाहिरात देऊन भरती करणे आवश्यक

पुणे : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये जाहिरात न देता त्याचबरोबर योग्य ती प्रक्रिया न पार पाडता कुठलीही पदे भरली जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. यापार्श्वभुमीवर सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात योग्य प्रक्रिया पार न पाडता केल्या जात असलेल्या भरती प्रक्रियेवर विद्यार्थी संघटनांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत. विद्यापीठ फंडातून या भरती केल्या जात आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकतेच विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी), सुरक्षा विभागाचे संचालक आदी पदे कोणतीही जाहिरात न देता भरण्यात आल्याची तक्रार उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांकडे मनविसेकडून करण्यात आली आहे. राज्य शासनाने ४ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये सार्वजनिक विद्यापीठांमध्ये जाहिरात न देता पद भरणे, शैक्षणिक अर्हता, पात्रता, अनुभव, वयाची अट न पाळणे आदी अनियमितता आढळून आल्यास संबंधित विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव यांना जबाबदार धरले जाईल असे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मात्र सर्रास या नियमांचे उल्लंघन करून विद्यापीठ फंडातून परस्पर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्य शासनाकडून भरती होत नसल्याने विद्यापीठ स्तरावर कंत्राटी पध्दतीने १५७ पदे निर्माण करण्यात आली आहेत. या पदांच्या निर्मितीवर आक्षेप नाही, मात्र त्यांची भरती प्रक्रिया योग्य पध्दतीने राबविण्यात येत नसल्याबाबत आक्षेप असल्याचे मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले आहे. काही पदे ११ महिन्यांसाठी, काही पदे ३ वर्षे, ५ वर्षे मुदतीसाठी भरण्यात आली आहेत. त्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा जाहिरात देऊन भरती करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या १०-१२ वर्षांपासून कोणतीही प्रक्रिया पार न पाडता त्यांना मुदतवाढ देण्यात येत आहे.  विद्यापीठाकडून नियुक्त झालेले कर्मचारी बराच काळ शासनमान्य पदावर कार्यरत राहतात. त्यानंतर सेवा नियमित करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला जातो. परंतु अशा प्रकारच्या अनियमिततेतून सवलत देता नाही, मात्र हे कर्मचारी सेवा नियमित करून वेतनविषयक तथा सेवानिवृत्तीचे लाभ मिळावे, यासाठी न्यायालयात धाव घेतात. त्यामुळे त्याला अटकाव करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. योग्य प्रकारे भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाल्यास याप्रकरणी कुलगुरू व कुलसचिवांना जबाबदार धरण्यात येईल असे शासनाने स्पष्ट केले आहे.....................व्यवस्थापन परिषदेतील बैठकीतील निर्णयानुसार कार्यवाहीराज्य शासनाने काढलेले आदेश हे शासनमान्य पदांकरिता आहेत. विद्यापीठाने जाहिरात न देता भरलेली पदे ही विद्यापीठ फंडातून भरण्यात आलेली आहेत. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ही पदे भरण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.- डॉ. अरविंद शाळीग्राम, प्रभारी कुलसचिव 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठMNSमनसे