शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र

By राजू इनामदार | Updated: June 12, 2025 18:57 IST

समिती स्थापन केल्यावर अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’

पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत बरेच गैरप्रकार झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्यांच्या या आरोपांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने राज्यात मशाल मोर्चांचेही आयोजन केले आहे. आता माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा पाठपुरावा करत थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनाच त्यासंबधी पत्र पाठवले आहे.

‘गांधी यांनी आकडेवारीनिशी आरोप केले आहेत. त्यांचे निराकरण करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, मात्र ते काहीही बोलत नाहीत, त्याऐवजी केंद्र व राज्यातील सरकारमध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी याला उत्तर देत आहे. तुम्ही देशाच्या सर्वोच्च अशा घटनात्मक पदावर आहात, त्यामुळेच तुम्हीच याची दखल घ्यावी. आरोपांच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी, तसेच समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’ अशी मागणी पटोले यांनी पत्रात केली आहे.

नाना पटोले सन २०१४ मध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले खासदार होते. पंतप्रधान मोदी यांची धोरणे पटत नसल्याची टीका करून त्यांनी सन २०१७ मध्ये खासदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष होते. त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले, मात्र नाना पटोले अल्प मतांनी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सध्या ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून थोडे बाजूला असून प्रसिद्धीत राहण्यासाठी तसेच राहुल यांच्याबरोबर जवळीक साधण्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचा प्रकार केला असल्याचे काँग्रेसमध्येच बोलले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMahayutiमहायुती