शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र

By राजू इनामदार | Updated: June 12, 2025 18:57 IST

समिती स्थापन केल्यावर अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’

पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत बरेच गैरप्रकार झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्यांच्या या आरोपांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने राज्यात मशाल मोर्चांचेही आयोजन केले आहे. आता माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा पाठपुरावा करत थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनाच त्यासंबधी पत्र पाठवले आहे.

‘गांधी यांनी आकडेवारीनिशी आरोप केले आहेत. त्यांचे निराकरण करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, मात्र ते काहीही बोलत नाहीत, त्याऐवजी केंद्र व राज्यातील सरकारमध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी याला उत्तर देत आहे. तुम्ही देशाच्या सर्वोच्च अशा घटनात्मक पदावर आहात, त्यामुळेच तुम्हीच याची दखल घ्यावी. आरोपांच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी, तसेच समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’ अशी मागणी पटोले यांनी पत्रात केली आहे.

नाना पटोले सन २०१४ मध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले खासदार होते. पंतप्रधान मोदी यांची धोरणे पटत नसल्याची टीका करून त्यांनी सन २०१७ मध्ये खासदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष होते. त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले, मात्र नाना पटोले अल्प मतांनी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सध्या ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून थोडे बाजूला असून प्रसिद्धीत राहण्यासाठी तसेच राहुल यांच्याबरोबर जवळीक साधण्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचा प्रकार केला असल्याचे काँग्रेसमध्येच बोलले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMahayutiमहायुती