शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

Budget 2019: नोकरदारांना हवी प्राप्तिकरात सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 03:52 IST

अपेक्षा अर्थसंकल्पाकडून : व्यापारी वर्गाला जीएसटी हवा १२ टक्क्यांच्या आत

पुणे : लोकसभा निवडणुकीपीर्र्वीचा अंतिम केंद्रीय अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. १) सादर होत आहे. या अर्थसंकल्पात सामान्य व्यक्तींना करमुक्त उत्पन्नमर्यादेत वाढ हवी असून, व्यापाऱ्यांना चैनीच्या वस्तू वगळता वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) स्लॅब १२ टक्क्यांच्या आत हवा आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने यात नागरिक आणि व्यापाºयांसाठीदेखील चांगल्या घोषणा असतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये आहे. त्यात ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच पुरुषांना ५ लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत, तर स्त्रियांना ६ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करावे, अशीही अपेक्षा व्यक्त होताना दिसते. ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर २ टक्के अधिक व्याज मिळावे, असे ज्येष्ठ नागरिक म्हणत आहेत.याबाबत प्रफुल्ल सारडा म्हणाले, की करमुक्त उत्पन्नामध्ये सरकारने वाढ केली पाहिजे. पुरुषांना ५ लाख आणि महिलांना ८ लाख रुपयांच्या उत्पन्नातून सूट दिली जावी. त्यामुळे अधिकाधिक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.ग्राहक पंचायतीचे विलास लेले म्हणाले, की सध्याचे वाढते खर्च पाहता करमुक्त उत्पन्न हे ५ ते ७ लाख रुपयांदरम्यान असावे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती हव्यात. ज्येष्ठ नागरिकांनी मुदत ठेवीत पैसे ठेवले असल्यास, त्यांना इतरांपेक्षा २ टक्के अधिक व्याज दिले जावे. तर, अधिकाधिक व्यापाºयांना कराच्या कक्षेत आणण्यासाठी जीएसटीची करश्रेणी १० टक्के इतकीच असावी. ‘एक देश-एक कर’ या घोषणेप्रमाणे व्यापाºयांना एकच कर लागू करावा. बाजार समितीत असलेला सेस (कर) रद्द झाला पाहिजे. अन्नधान्यासहित सर्वच जीवनावश्यक वस्तू करमुक्त असल्या पाहिजेत. जीएसटीची करश्रेणी १२ टक्क्यांच्या आत करावी, अशी आग्रही मागणी असल्याचे कॉन्फडरेश्न आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे पश्चिम विभाग समन्वयक अजित सेटिया यांनी सांगितले.प्राप्तिकर बंद करून अप्रत्यक्ष कर गोळा करावा...२८ टक्के जीएसटी असावा. केंद्र सरकारने जीएसटी पुनर्रचनेत ५, १२ आणि १८ अणि करमुक्त असे विविध स्तर केले आहेत. मात्र, जीएसटी शून्य ते १२ टक्के असावा. कररचना माफक असल्यास अधिकाधिक व्यापारी त्यात येतील. त्यामुळे करातही वाढ होईल, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने प्राप्तिकर बंद करुन, केवळ अप्रत्यक्ष करच गोळा करावेत, अशी अपेक्षाही काही व्यापाºयांकडून व्यक्त होत आहे.चैनीच्या वस्तू वगळता इतर वस्तूंसाठी १२ टक्क्यांच्या वर जीएसटी असता कामा नये. तसेच, प्राप्तिकरासारखा थेट कर वसूल करणे सरकारने बंद करायला हवे. अप्रत्यक्ष कर हेच सरकारी महसुलाचे मुख्य माध्यम असायला हवे.- अजित सेटिया, कॉन्फडरेश्न आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स, पश्चिम विभाग समन्वयकमोठ्या कारखानदारांना करात सवलत दिली जाते. नोकरदारांना फारशी सवलत दिली जात नाही. विविध उद्योग-व्यवसायात दर वर्षी होणारी वेतनवाढ लक्षात घेऊन करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ठरविली जावी.- जीवनधर जबडे, नागरिक

टॅग्स :TaxकरBudget 2019अर्थसंकल्प 2019