शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

विश्वास पाटलांनी ‘संभाजी’ कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान - संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 19:21 IST

विश्वास पाटलांनी माफी मागून लिखाण मागे घ्यावे, अन्यथा सातारा येथील नियोजित संमेलन होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे

पुणे : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक विश्वास पाटिल यांच्यानिवडीवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला आहे. पाटिल यांनी ‘संभाजी’ कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा करत, त्यांनी माफी मागून लिखाण मागे घ्यावे, अन्यथा सातारा येथील नियोजित संमेलन होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजित पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे,प्रवक्ते संतोष शिंदे चंद्रशेखर घाडगे आणि अविनाश मोहिते उपस्थित होते. ॲड. आखरे म्हणाले , छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली आहे. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. रणशूर, पराक्रमी, दूरदृष्टी असलेले राज्यकारभारी आणि विद्वत्तेच्या जोरावर शत्रूंना धडकी भरवणारे राजे होते. स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी १६ वर्षांच्या शौर्यपूर्ण लढ्यानंतर आयुष्याचे बलिदान दिले.

अशा पराक्रमी आणि विद्वान सम्राटाचे चारित्र्यहनन करण्याचा किंवा इतिहास विकृत करण्याचा कोणालाही अधिकार नाही. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या विश्वास पाटील लिखित "संभाजी" या कादंबरीत महाराजांविषयी खोटी, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक माहिती सादर केली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा मजकूर ब्रिगेडने या लिखाणाला विरोध करून आक्षेप नोंदवला होता, परंतु विश्वास पाटील यांनी मजकूर दुरुस्त केला नाही. तसेच २०२५ मध्ये २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन झाले असून यात कोणतीही दुरुस्ती केल्याचे दिसत नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. अशा वादग्रस्त लेखकाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनवणे म्हणजे संभाजी महाराजांच्या चारित्र्यहननाला शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. या संदर्भात विश्वास पाटिल आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून १५ दिवसात यावर उत्तर अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अखिल भारतीय साहित्य परिषद कुठली ?

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाद्वारे साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात येते. इतर घटक संस्थांपैकी ही एक संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद संमेलन अध्यक्षपदाची निवड करत नाही तो अधिकार महामंडळाला आहे. संभाजी ब्रिगेडने सांगितल्यानुसार अखिल भारतीय साहित्य परिषदेला नोटीस पाठवलेली आहे. पण ही संस्था नेमकी कुठली? असा प्रश्न उपस्थित झाला याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना विचारले असता त्यांना कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आज पुणे येथे संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली.“संभाजी” कादंबरीला मिळालेल्या लीगल नोटीसमध्ये नेमके प्रसंग दाखवलेले नाहीत. संभाजीराजांविषयी संशोधन करूनच लेखन केले असून काही चूक राहिली असेल तर ती दुरुस्त करण्यास व दिलगिरी व्यक्त करण्यास मी तयार आहे. मात्र आक्षेप स्पष्टपणे सांगावेत, अशी मागणी केली आहे. – विश्वास पाटील, निर्वाचित अध्यक्ष, ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन

English
हिंदी सारांश
Web Title : Sambhaji Brigade opposes Vishwas Patil's book, alleging Shivaji Maharaj insult.

Web Summary : Sambhaji Brigade objects to Vishwas Patil's selection as literary meet president, citing alleged insults to Chhatrapati Sambhaji Maharaj in his novel 'Sambhaji'. They demand an apology and retraction, threatening to disrupt the conference. Patil says he's ready to correct any mistakes if pointed out.
टॅग्स :PuneपुणेVishwash Patilविश्वास पाटील Chhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद