शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

विश्वास पाटलांनी ‘संभाजी’ कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान - संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 19:21 IST

विश्वास पाटलांनी माफी मागून लिखाण मागे घ्यावे, अन्यथा सातारा येथील नियोजित संमेलन होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे

पुणे : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक विश्वास पाटिल यांच्यानिवडीवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला आहे. पाटिल यांनी ‘संभाजी’ कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा करत, त्यांनी माफी मागून लिखाण मागे घ्यावे, अन्यथा सातारा येथील नियोजित संमेलन होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजित पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे,प्रवक्ते संतोष शिंदे चंद्रशेखर घाडगे आणि अविनाश मोहिते उपस्थित होते. ॲड. आखरे म्हणाले , छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली आहे. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. रणशूर, पराक्रमी, दूरदृष्टी असलेले राज्यकारभारी आणि विद्वत्तेच्या जोरावर शत्रूंना धडकी भरवणारे राजे होते. स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी १६ वर्षांच्या शौर्यपूर्ण लढ्यानंतर आयुष्याचे बलिदान दिले.

अशा पराक्रमी आणि विद्वान सम्राटाचे चारित्र्यहनन करण्याचा किंवा इतिहास विकृत करण्याचा कोणालाही अधिकार नाही. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या विश्वास पाटील लिखित "संभाजी" या कादंबरीत महाराजांविषयी खोटी, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक माहिती सादर केली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा मजकूर ब्रिगेडने या लिखाणाला विरोध करून आक्षेप नोंदवला होता, परंतु विश्वास पाटील यांनी मजकूर दुरुस्त केला नाही. तसेच २०२५ मध्ये २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन झाले असून यात कोणतीही दुरुस्ती केल्याचे दिसत नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. अशा वादग्रस्त लेखकाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनवणे म्हणजे संभाजी महाराजांच्या चारित्र्यहननाला शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. या संदर्भात विश्वास पाटिल आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून १५ दिवसात यावर उत्तर अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अखिल भारतीय साहित्य परिषद कुठली ?

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाद्वारे साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात येते. इतर घटक संस्थांपैकी ही एक संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद संमेलन अध्यक्षपदाची निवड करत नाही तो अधिकार महामंडळाला आहे. संभाजी ब्रिगेडने सांगितल्यानुसार अखिल भारतीय साहित्य परिषदेला नोटीस पाठवलेली आहे. पण ही संस्था नेमकी कुठली? असा प्रश्न उपस्थित झाला याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना विचारले असता त्यांना कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आज पुणे येथे संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली.“संभाजी” कादंबरीला मिळालेल्या लीगल नोटीसमध्ये नेमके प्रसंग दाखवलेले नाहीत. संभाजीराजांविषयी संशोधन करूनच लेखन केले असून काही चूक राहिली असेल तर ती दुरुस्त करण्यास व दिलगिरी व्यक्त करण्यास मी तयार आहे. मात्र आक्षेप स्पष्टपणे सांगावेत, अशी मागणी केली आहे. – विश्वास पाटील, निर्वाचित अध्यक्ष, ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन

English
हिंदी सारांश
Web Title : Sambhaji Brigade opposes Vishwas Patil's book, alleging Shivaji Maharaj insult.

Web Summary : Sambhaji Brigade objects to Vishwas Patil's selection as literary meet president, citing alleged insults to Chhatrapati Sambhaji Maharaj in his novel 'Sambhaji'. They demand an apology and retraction, threatening to disrupt the conference. Patil says he's ready to correct any mistakes if pointed out.
टॅग्स :PuneपुणेVishwash Patilविश्वास पाटील Chhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद