शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
7
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
8
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
9
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
10
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
11
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
12
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
13
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
14
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
15
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
16
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
17
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
18
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
19
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
20
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

By राजू इनामदार | Updated: April 29, 2025 18:52 IST

कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष करून या निकालाचे स्वागत केले, स्वत: कलमाडी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटले नाही

पुणे: एकेकाळचे शहराचे सर्वेसर्वा असलेले काँग्रेसचे नेते, माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी त्यांच्यावर राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेत झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपातून मुक्त झाले. सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावरचे सर्व आरोप मागे घेतले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष करून या निकालाचे स्वागत केले, स्वत: कलमाडी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटले नाही.

कलमाडी पुणे शहराचे निवडून आलेले खासदार होते. पुणे फेस्टिवल, पुणे मॅरेथॉन अशा उपक्रमांमधून त्यांनी पुणे शहराला आंतरराष्ट्रीय नकाशात कायमचे स्थान मिळवून दिले होते. तब्बल १५ वर्षांनंतर सोमवारी (दि.२८) त्यांच्यावरच्या सर्व आरोपांमधून ते निर्दोष बाहेर पडले. मंगळवारी त्यासंबधीच्या बातम्या येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना व पत्रकारांनाही सांगण्यात आले.

तरीही काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कलमाडी हाऊस या कर्वे रस्त्यावरील निवासस्थानासमोर फटाके वाजवले. सचिन आडेकर, संदीप मोकाटे, राजू मगर, नरेंद्र काते, भगवान कडू, संताजी खामकर, अण्णा गोसावी, आबा जगताप, अतूल गोंजारी यांचा त्यात समावेश होता. त्यांनी सांगितले की त्यांना आराम मिळावा म्हणून आम्हीही भेटीसाठी आग्रह धरला नाही. १ मे ला त्यांचा वाढदिवस आहे. त्यादिवशी भेटून आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. कलमाडी यांचे क्रिडाक्षेत्रातील निकटचे सहकारी ॲड. अभय छाजेड, त्यांच्या विविध उपक्रमातील सहकारी संगिता तिवारी यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली.

या आरोपांमुळे कलमाडी यांची वेगात व भरातही असलेली राजकीय कारकिर्द झाकोळली. त्यातच काँग्रेस पक्षाने याच आरोपांवरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कलमाडी जवळपास राजकीय विजनवासात गेले होते. पुणे फेस्टिवल वगळता ते पुण्याच्या सार्वजनिक कार्यक्रमात गायबच झाले होते. शहराच्या विकासासंबधी काहीही समस्या निघाली की बहुसंख्य राजकीय कार्यकर्त्यांकडून आत्ता कलमाडी पाहिजे होते असे बोलले जात असते. काँग्रेसच्या शहर शाखेला तर त्यानंतरच उतरती कळाच लागली असल्याचे काँग्रेसचेच कार्यकर्ते सांगत असतात.

भारतीय जनता पक्षानेच त्या काळात अनेक कटकारस्थाने करून कलमाडी यांच्यावर किटाळ आणले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही त्यांनी असाच त्रास दिला. मात्र अखेर सत्यमेव जयते हेच खरे ठरले. कलमाडी यांच्यावरील आरोप निराधार ठरल्याने भाजपचेच पितळ उघडे पडले आहे.- मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणCourtन्यायालय