शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

केंद्र आणि राज्यातील सरकार सारखेच; शरद पवारांना जाब विचारणार - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 19:02 IST

काँग्रेसच्या केंद्र सरकारने भूमी अधिग्रहण कायदा केला...

पुणे: शेतकऱ्यांवर अन्याय करण्याच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकार यांचे एकमत असते. भूमी अधिग्रहण कायद्यातील दुरूस्ती त्यामूळेच झाली. पावसात भिजून शेतकऱ्यांची मते मागणाऱ्या शरद पवारांना (sharad pawar) हे चालते का असा जाब त्यांची भेट घेऊन विचारणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (raju shetty) यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन विकास करण्याचा हा प्रकार आम्ही मुळीच खपवून घेणार नाही, या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराच शेट्टी यांनी दिला.

पत्रकारांबरोबर बोलताना बुधवारी दुपारी पुण्यात शेट्टी म्हणाले, काँग्रेसच्या केंद्र सरकारने भूमी अधिग्रहण कायदा केला. त्याला नख लावण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. पण मी खासदार असताना व त्यांच्या आघाडीचा भाग असतानाही त्यांना विरोध केला. त्यावेळी शरद पवार, शिवसेना काँग्रेस माझ्याबरोबर होते. त्यामुळे मोदी सरकारला ती दुरूस्ती गुंडाळून ठेवावी लागली.

मात्र आता राज्य सरकार ही दुरूस्ती करत असून त्यानूसार परिपत्रकही जाहीर करण्यात आले. या दुरूस्तीबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, आता शेतकऱ्याला जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या नूकसान भरपाईच्या रकमेत २० टक्के कपात करण्यात आली. बाजारभावाच्या चौपट दराने भरपाई देण्याची तरतूद असताना ती फक्त दोनपट करण्यात आली. यात शेतकऱ्यांचे कितीतरी नूकसान आहे. त्यांच्याच जमिनी घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ही दुरूस्ती मान्य करणार नाही. सरकारने ही दुरूस्ती त्वरीत मागे घेतल्याचे जाहीर करावे, अन्यथा राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू करू.

पनवेल इथे यासंदर्भात गुरूवारीच बैठक आहे. शरद पवार यांनी पावसात भिजून शेतकऱ्यांना सांभाळण्याचा शब्द दिला आहे. तो शब्द असा पाळणार आहात का, असा प्रश्न त्यांची लवकरच प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणार आहे असे शेट्टी म्हणाले. रस्ते तसेच अन्य मोठ्या प्रकल्पांना शेतकऱ्यांच्या जमिनी लागतात. त्यांची नूकसान भरपाई मोठी असेल तर प्रकल्पाची किंमत वाढते, त्यासाठी केंद्र सरकारच्या सुचनेवरून राज्य सरकार भूमी अधिग्रहण कायद्यात हा बदल करत आहे असा आरोप शेट्टी यांनी केला. कोटयवधी रूपयांचा भ्रष्टाचार राज्य सरकारमध्ये सुरू आहे. कुठे किती पैसे मूरत आहेत ते बंद करायचे सोडून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रकार आहे व त्यात केंद्र आणि राज्य सरकार सारखेच भागीदार आहेत अशी टीका शेट्टी यांनी केली. 

मुख्यमंत्री ऊपमुख्यमंत्री यांना का नाही भेटणार असे विचारले असता कोणाची कळ दाबायची ते आम्हाला चांगले कळते असे ऊत्तर शेट्टी यांनी दिले. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला दिवंगत विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारRaju Shettyराजू शेट्टीMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी