शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र आणि राज्यातील सरकार सारखेच; शरद पवारांना जाब विचारणार - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 19:02 IST

काँग्रेसच्या केंद्र सरकारने भूमी अधिग्रहण कायदा केला...

पुणे: शेतकऱ्यांवर अन्याय करण्याच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकार यांचे एकमत असते. भूमी अधिग्रहण कायद्यातील दुरूस्ती त्यामूळेच झाली. पावसात भिजून शेतकऱ्यांची मते मागणाऱ्या शरद पवारांना (sharad pawar) हे चालते का असा जाब त्यांची भेट घेऊन विचारणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (raju shetty) यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन विकास करण्याचा हा प्रकार आम्ही मुळीच खपवून घेणार नाही, या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराच शेट्टी यांनी दिला.

पत्रकारांबरोबर बोलताना बुधवारी दुपारी पुण्यात शेट्टी म्हणाले, काँग्रेसच्या केंद्र सरकारने भूमी अधिग्रहण कायदा केला. त्याला नख लावण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. पण मी खासदार असताना व त्यांच्या आघाडीचा भाग असतानाही त्यांना विरोध केला. त्यावेळी शरद पवार, शिवसेना काँग्रेस माझ्याबरोबर होते. त्यामुळे मोदी सरकारला ती दुरूस्ती गुंडाळून ठेवावी लागली.

मात्र आता राज्य सरकार ही दुरूस्ती करत असून त्यानूसार परिपत्रकही जाहीर करण्यात आले. या दुरूस्तीबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, आता शेतकऱ्याला जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या नूकसान भरपाईच्या रकमेत २० टक्के कपात करण्यात आली. बाजारभावाच्या चौपट दराने भरपाई देण्याची तरतूद असताना ती फक्त दोनपट करण्यात आली. यात शेतकऱ्यांचे कितीतरी नूकसान आहे. त्यांच्याच जमिनी घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ही दुरूस्ती मान्य करणार नाही. सरकारने ही दुरूस्ती त्वरीत मागे घेतल्याचे जाहीर करावे, अन्यथा राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू करू.

पनवेल इथे यासंदर्भात गुरूवारीच बैठक आहे. शरद पवार यांनी पावसात भिजून शेतकऱ्यांना सांभाळण्याचा शब्द दिला आहे. तो शब्द असा पाळणार आहात का, असा प्रश्न त्यांची लवकरच प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणार आहे असे शेट्टी म्हणाले. रस्ते तसेच अन्य मोठ्या प्रकल्पांना शेतकऱ्यांच्या जमिनी लागतात. त्यांची नूकसान भरपाई मोठी असेल तर प्रकल्पाची किंमत वाढते, त्यासाठी केंद्र सरकारच्या सुचनेवरून राज्य सरकार भूमी अधिग्रहण कायद्यात हा बदल करत आहे असा आरोप शेट्टी यांनी केला. कोटयवधी रूपयांचा भ्रष्टाचार राज्य सरकारमध्ये सुरू आहे. कुठे किती पैसे मूरत आहेत ते बंद करायचे सोडून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा हा प्रकार आहे व त्यात केंद्र आणि राज्य सरकार सारखेच भागीदार आहेत अशी टीका शेट्टी यांनी केली. 

मुख्यमंत्री ऊपमुख्यमंत्री यांना का नाही भेटणार असे विचारले असता कोणाची कळ दाबायची ते आम्हाला चांगले कळते असे ऊत्तर शेट्टी यांनी दिले. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला दिवंगत विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारRaju Shettyराजू शेट्टीMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी