शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Bharat Gaurav Train: महाराष्ट्रावर रेल्वे प्रशासनाचा अन्याय; एकही भारत गौरव महाराष्ट्रात का नाही?

By नितीश गोवंडे | Updated: May 8, 2023 18:10 IST

राज्यात शिर्डी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, महालक्ष्मी, वेरुळ-अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेण्या, घृष्णेश्वर, महाबळेश्वर, अष्टविनायक, गणपती पुळे अशी प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळे

पुणे : रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत ‘भारत गौरव पर्यटनरेल्वे’ चालवल्या जात आहेत. यामध्ये देशातील तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटनस्थळांना भेटी देऊन देशातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्राला समृद्ध असा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला असूनही अन्य राज्यांतून महाराष्ट्रात एकही ‘भारत गौरव रेल्वे’ आलेली नाही. आयआरसीटीसी मार्फत देशातील विविध ठिकाणांहून २८ ‘भारत गौरव रेल्वे’ चालवण्यात येत आहेत. पैकी पुण्यातून एक रेल्वे २८ एप्रिल रोजी सुटली तर दुसरी ११ मे रोजी सुटणार आहे.

महाराष्ट्रावर रेल्वे प्रशासनाने अन्याय केला असून, अन्य राज्यांमधून महाराष्ट्रासाठी ‘भारत गौरव रेल्वे’ सुरू करायला हव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. राज्यात शिर्डी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, महालक्ष्मी, वेरुळ-अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेण्या, घृष्णेश्वर, महाबळेश्वर, अष्टविनायक, गणपती पुळे अशी प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळे असताना महाराष्ट्राच्या बाबतीत रेल्वेने कोणताच विचार न केल्याचे यावरून स्पष्ट होते, यामुळे ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या भारत गौरव पर्यटन रेल्वेत महाराष्ट्राचाही समावेश करावा अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांसह, रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीtourismपर्यटनSocialसामाजिकCentral Governmentकेंद्र सरकार