शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पवित्र इंद्रायणी नदीचे चित्र पालटण्यासाठी पुढाकार घेणार : नाना पटोले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 12:05 IST

आळंदीतील दर्शनबारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत बैठक 

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रलंबित असलेला दर्शनबारीचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने तसेच पवित्र इंद्रायणीच्या स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यावश्यक उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी मुंबई येथे संबंधित विभाग व स्थानिक प्रतिनिधींची बैठक घेऊन दोन्ही प्रश्न तात्काळ मार्गी लावले जातील अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी दिली.     

पटोलेे यांनी शुुक्रवारी (दि.४) रात्री उशिरा यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे पाटील, योगेश देसाई, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, राहुल चिताळकर, ह.भ.प. चैतन्य कबीर,  व्यवस्थापक माऊली वीर आदी मान्यवर उपस्थित होते.   

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित तसेच बहुचर्चेत असलेल्या दर्शनबारी आरक्षणाच्या जागेवर जाऊन नानासाहेब पटोले यांनी पाहणी केली. त्यांनतर भक्ती सोपान पुलावरून इंद्रायणी नदीची पाहणी केली. मात्र पवित्र इंद्रायणीची सध्याची झालेली अवस्था पाहून त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. इंद्रायणी प्रदूषण मुक्त व्हावी या भावनेतून लवकरच संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून तिचं पावित्र्य जोपासण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. 

 

दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरात आळंदी विकास आराखड्यासंदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकीवारीत आवश्यक ती खबरदारी घेऊन सोहळा संपन्न करण्याच्या सूचना पटोले यांनी देवस्थान कमिटीला दिल्या. शेवटी आळंदीतील कबीर मठाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरindrayaniइंद्रायणीriverनदीNana Patoleनाना पटोले