शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 10:29 IST

मोदींनी देश विकायला काढला असून ७० टक्के रेल्वे विकली, एअर इंडिया, एलआयसी, ऑइल कंपन्याही विकल्या त्यामुळे देशावरील कर्जात वाढ झाली

पुणे : मोदी सत्तेत आल्यापासून देशात अराजकता पसरली असून, हुकूमशाही पद्धतीने देशाचा कारभार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. महागाई, खासगीकरण, जीएसटी, वेगवेगळ्या त्रासदायक चौकशांमुळे जवळपास १७ लाख भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ डेक्कन नदीपात्रात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, मागील दहा वर्षात देशावरील कर्जाचा आकडा वाढतच चालला आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. भाजपकडून संविधान बदलण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. त्यांचे हे कट कारस्थान हाणून पाडण्यासाठी आणि संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करण्याची संधी मतदारांना आली आहे. 'वंचित'ने सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन त्यांना उमेदवारी देत मुख्य प्रवाहात आणले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राजकारणाला नागरिक कंटाळलेले आहे. त्यामुळे आपल्याला उद्याच्या भारतासाठी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठी १०० टक्के मतदान करा. आपल्या मतातून निश्चितच बदल घडेल.

वसंत मोरे म्हणाले, रोड रोलरच्या माध्यमातून पुण्यातील खड्डे बुजवायचे आहे. सत्ता असताना भाजपने पुणे शहराला काय दिले? भाजपने पुणेकरांना फक्त गाजर दाखवले. शहरातील समस्या दूर न करता पुणेकरांना खड्ड्यात घालण्याचे काम केले. नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांची लूट करण्यात येत आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली सरण रचण्याचे काम सुरू आहे. धर्माच्या नावाखाली मत न मागता आतापर्यंत केलेल्या कामाच्या नावावर भाजपने मते मागावी.

मेट्रो म्हणजे वाया गेलेली इन्व्हेस्टमेंट 

पुण्यात पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नांवर काम झाले नाही. मोदींनी देश विकायला काढला असून ७० टक्के रेल्वे विकली. एअर इंडिया, एलआयसी, ऑइल कंपन्या विकल्या. देशावरील कर्जात वाढ झाली आहे. त्यात पुण्याची मेट्रो म्हणजे वाया गेलेली इन्व्हेस्टमेंट असून, मेट्रोमुळे कर्जात वाढच झाली आहे. एकीकडे मेट्रोचा गाजावाजा करतात आणि दुसरीकडे रेल्वेचे खासगीकरण केले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीVasant Moreवसंत मोरेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीInflationमहागाईGSTजीएसटी