शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Indian Army: भारतीय लष्करात स्वदेशी बनावटीची चिलखती वाहने दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 21:52 IST

आत्मनिर्भर भारत अंतर्गत युद्धासामुग्री बनवण्यासाठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे

पुणे : आत्मनिर्भर भारत अंतर्गत युद्धासामुग्री बनवण्यासाठी स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समूह आणि कल्याणी समूहाने बनवलेली चिलखती वाहने नुकतीच लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि उपलष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या उपस्थितीत लष्करात दाखल करण्यात आली आहे. या वाहनांमुळे युद्धात होणारा शत्रुचा गोळीबार, बॉम्बवर्षावात सैन्य सुरक्षित राहणार आहे. बॉम्बे सॅपर्स ग्रुपमध्ये एका कार्यक्रमात ही वाहने लष्कराला सुपूर्द करण्यात आली.  

भारतीय लष्करात यापूर्वी रशिया किंवा अन्य देशांनी तयार केलेली चिलखती वाहने आहेत. मात्र आता स्वदेशी बनावटीची उच्च दर्जाची ही वाहने लष्करात दाखल झाली आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत आणखी एक महत्त्वपुर्ण पाऊल पडले आहे. लडाख सारख्या अतिउंचावरील क्षेत्रात सैन्याला वेगाने पोहचवण्यासाठी टाटा उद्योग समुहाने संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्या मदतीने इन्फन्ट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी व्हेहिकल्स (आयपीएमव्हीएल) ही चिलखती वाहने तयार केली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यातील कारखान्यातच या वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. 

भारतीय सैन्याने वाळवंट आणि अतिउंचावरील भागात या वाहनांच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यामध्ये ही वाहने यशस्वी ठरली आहेत. वाहनांमध्ये डीआरडीओच्या डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीने विकसित केलेले एक्स्टर्नल अ‍ॅड-आॅन आर्मर प्रोटेक्शन पॅनेल्स आणि थर्मल साईट्ससह  रिमोट कंट्रोल्ड वेपन सिस्टीमचा देखील समावेश आहे. यामुळे शत्रुची भूसुरंगे तसेच हायक्वालीटीचे शस्त्रसुद्धा या वाहनांना भेदू शकत नाही. या वाहनांची बांधणी लष्कराच्या मागणीनुसार करण्यात आली असून १२ युनिट देण्यात आली आहे. 

टॅग्स :IndiaभारतForceफोर्सSocialसामाजिकcommissionerआयुक्तnda puneएनडीए पुणे