शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

सॉफ्टवेअरमधील भारताचा वाटा ८० अब्ज डॉलरवर नेणार : ओंकार राय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 19:46 IST

सॉफ्टवेअर उत्पादनांची जागतिक बाजारपेठ तब्बल ५०० अब्ज डॉलर

ठळक मुद्देपुणे कनेक्ट परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी घोषणासरकारी पातळीवर विविध मंत्रालये व व्यवसायातील तज्ज्ञांकडून पोषक वातावरण तयार

पुणे : सॉफ्टवेअर (संगणक अज्ञावली) उत्पादनांची जागतिक बाजारपेठ तब्बल ५०० अब्ज डॉलरची असून, त्यात भारताचा वाटा सुमारे ८ अब्ज डॉलरचा आहे. हा व्यवसाय २०२५ पर्यंत ७० ते ८० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. त्याचसाठी सरकारी पातळीवर विविध मंत्रालये व व्यवसायातील तज्ज्ञांकडून पोषक वातावरण तयार करण्याच प्रयत्न सुरु असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाचे (एसटीपीआय) महासंचालक डॉ. ओंकार राय यांनी सांगितले. सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणतर्फे (सीप) आयोजित आठव्या ‘पुणे कनेक्ट’ परिषदेचे उद्घाटन पुण्यात राय यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. सीपच्या कार्यकारी समितीचे सदस्य व पुणे कनेक्टचे प्रमुख अभिजित अत्रे, सीपचे अध्यक्ष अश्विन मेघा, उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे, पुणे कनेक्ट कार्यक्रम संचालक स्वप्नील देशपांडे या वेळी उपस्थित होते. तंत्रज्ञानातील सल्लागार जसप्रीत बिंद्रा लिखित ‘द टेक व्हिस्परर’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘फ्यूचर इन द कनेक्टेड वर्ल्ड’ ही या वर्षीच्या पुणे कनेक्टची मध्यवर्ती संकल्पना होती. सिस्कोचे भारत व सार्क देशांमधील अध्यक्ष समीर गद्रे यांच्या व्याख्यानासह अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि पुन्हा धीराने उभ्या राहिलेल्या अनमोल रॉड्रिग्स यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम या वेळी घेण्यात आला.    राय म्हणाले, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अंतर्गत देशात २८ उत्कृष्ट केंद्र (सेंटर ऑ फ एक्सलन्स) उभारली जात आहेत. त्याद्वारे माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या तज्ञांचा एक समुह तयार केला जात आहे. त्यासाठी विविध सरकारी विभागांकडून ६०० कोटींहून अधिक रुपयांची मदत देऊ केली जात आहे. कृत्रीम बुद्धीमत्त (आर्टिफिशियल इंटलिजन्स), इंटरनेट आॅफ थिंग्ज, ब्लॉक चेन अशा विविध विषयांसाठी ही सेंटर आॅफ एक्सलन्स काम करतील.व्यावसायिकांनी डिजिटल होणे म्हणजे केवळ कंपनीचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅप तयार करणे नव्हे. तर, संपूर्ण व्यवसायाचा दृष्टीकोनच बदलणे अपेक्षित आहे. त्यामुळेच डिजिटल परिवर्तनाची प्रक्रिया बाहेरुन करुन घेऊन चालणार नाही. कंपनीच्या मालकाने अथवा प्रमुख कार्यकारी अधिकाºयाने त्यात स्वत: लक्ष घालायला हवे, असे बिंद्रा म्हणाले. --------------

टॅग्स :PuneपुणेSoftware Technology Parkआयटी पार्क नागपूरITमाहिती तंत्रज्ञानbusinessव्यवसाय