शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

भारतीयांचे तिरस्कार नाही तर विकासाच्या राजकारणाला प्राधान्य : रामराजे नाईक निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 2:48 PM

वक्तृत्वोतेजक सभेच्या सहकार्याने आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजीत वसंतव्याख्यानमालेच्या उद्घटानाचे प्रथम पुष्प गुंफतांना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

पुणे : भारतीयांनी तिरस्काराच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणालाच प्राधान्य दिले आहे. शांततामय सहजीवन हे भारतीय लोकशाहीचे गुणसुत्रे आहेत, असे म्हणटल्यास अतिशाेयाेक्ती होणार नाही, असे मत राज्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

वक्तृत्वोतेजक सभेच्या सहकार्याने आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजीत वसंतव्याख्यानमालेच्या उद्घटानाचे प्रथम पुष्प गुंफतांना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे अध्यक्ष आणि पुणे मनपाचे नगरसेवक रविंद्र माळवदकर आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे कार्याध्यक्ष भाई कात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदाचे सत्ताविसावे वर्ष आहे. 

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, भारतीय उपखंडाचा इतिहास पाहिला तर पाकिस्तान, ब्रम्हदेश, बांग्लादेश या भारता शेजारील राष्ट्रांत आजही लोकशाही व्यवस्था पाळमुळे रुजली नाहीत. त्या तुलनेत भारतात लोकशाहीची पाळेमुळे केवळ रुजली नाहीत तर लोकशाही बहरली, फुलली समृद्ध झाल्याचा अनुभव भारतीय नागरीक घेत आहे. या स्थिती पर्यंत पोहचण्यात राजकीय पक्षांपेक्षा सर्वसामान्य नागरीकांच्या योगदान अधिक आहे. लोकशाही मुल्यांवरील सर्वसामान्यांचा असलेल्या विश्वासामुळेच भारतीय लोकशाही आणि लोकशाहीतील निवडणुक प्रक्रिया मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेषकांचा संशोधनाचा विषय ठरला आहे. 

भारतीय नागरीकांच्या मनाचा ठाव त्यांना आजवर लागत नाही. निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांमध्ये होत असलेली चिखलफेक पाहता ही भारतीय खंडाची शेवटची निवडणुक असल्याचे निष्कर्श या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेशकांनी अनेकदा नोंदवले आहे. पंरतु ज्या शांततेच्या वातावरणात लोकशाहीत सत्तेचं परिवर्तन होते की हे विश्लेषक बुचकळ्यात पडतात. नाना विविध समुदयाचे, जाती-धर्माचे, विचारधारेचे लोक भारतात राहत असतांना देखील भारतीय लोकशाहीतील सत्तांत्तर प्रक्रिया अतिशय शांततेत होते. अनेकदा राजकीय पक्ष चुकते पंरतु सर्वसामान्य नागरीकांनी सांभाळून घेतले. स्वातंत्र्य संग्रामात ज्या नेतृत्वांनी आहुती दिली, बलिदान केले त्यांच्या त्यागावर आणि आहुतीवरच भारतीय लोकशाहीची मुल्ये टिकली असून ती मुल्ये पिढ्यांनपिढ्या परवर्तीत होत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर