शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भारतात चांगली अन् राहण्यायोग्य शहरे उभारण्यासाठी जागतिक निधी मिळणार; जी २०चा मुख्य उद्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 20:14 IST

भारत विकासाच्या मार्गावर असून, त्यासाठी जी २० अतिशय उपयुक्त ठरणार

पुणे : भविष्यात चांगली राहण्यायोग्य शहरे निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. त्या प्रकल्पांना जागतिक स्तरावरून फंडिंग मिळावे, यासाठी जी २० परिषदेचे आयोजन पुण्यात केले होते. त्यामध्ये सहभागी देशांनी त्यांच्या विकासाची मार्गदर्शक तत्त्वे सादर केली. त्याचा वापर करून भारतात तशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सोलोमोन ओकियोराज यांनी दिली.

पुण्यात दोन दिवस जी २० परिषद भरविली होती, त्याचा मंगळवारी समारोप झाला. त्यानंतर परिषदेत काय मुद्दे चर्चिले गेले, त्याविषयी सोलोमोन यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या परिषदेत जगभरातील ६४ प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले होते. या पहिल्या टप्प्यातील परिषदेनंतर मार्च २०२३ मध्ये दुसरी परिषद होणार आहे.

जी २० मध्ये सहभागी झालेल्या देशांसमोर भारतातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प सादर करण्यात आले. सहभागी देशांनीही त्यांच्याकडील विकासाच्या मॉडेलची माहिती दिली. पहिल्या दिवशीच्या कार्यशाळेत खासगी क्षेत्रातून गुंतवणूक वाढावी यावर चर्चा झाली. त्यात विविध गुंतवणुकीचे मॉडेल सादर झाले. या कार्यशाळेतील सर्व बाबींवर काम करून भविष्यातील प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी शहराच्या क्षमता विकास कशी करता येईल, यावर भर देण्यात आला.

सोलोमोन म्हणाले, दोन दिवस जी २० मधील देश पुण्यात होते. पुण्याचे वैभव पाहून त्यांनी कौतुक केले. आदरातिथ्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरे शाश्वत विकासाद्वारे कशी तयार केली जातील. त्यावर चर्चा झाली. त्यासाठी देशातील शहरांमध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी परदेशी गुंतवणूक कशी मिळवता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. भविष्यात शहरे चांगली करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून सर्व प्रकल्प साकार करण्यात येतील. प्रकल्पांना जागतिक फंडिंग मिळणे सोपे जावे म्हणून जी २० परिषद आयोजिली होती, असे सोलोमोन यांनी सांगितले.

सरकार गॅरंटीयर म्हणून काम करणार

आम्ही देशातील चांगल्या महापालिकांची यादी केली असून, ज्यांचा क्रेडिट रेट चांगला आहे, त्यांच्या प्रकल्पांमध्ये परदेशी गुंतवणूक यावी म्हणून सरकार गॅरंटीयर म्हणून काम करणार आहे. भारत विकासाच्या मार्गावर असून, त्यासाठी जी २० अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

वर्ल्ड बँकेकडून निधी

चांगल्या सुविधा मिळतात, म्हणून नागरिक शहराकडे वळत आहेत. तो शहरात येतो, तेव्हा त्याला शहरांमध्ये चांगल्या सोयी मिळाव्यात, यासाठी काम करण्यात येणार आहे. त्यांना ज्या सुविधा हव्यात, त्या उभारण्यासाठी किती निधी लागेल, यावर जी २० मधून मदत मिळणार आहे. आताही अनेक शहरांमधील वाहतूकव्यवस्था, जल व्यवस्थापन आदी प्रकल्पांसाठी वर्ल्ड बँकेकडून निधी मिळत आहे.

टॅग्स :PuneपुणेInternationalआंतरराष्ट्रीयMONEYपैसाIndiaभारतSmart Cityस्मार्ट सिटी