शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा इंडिया आघाडीचा एकमेव उद्देश-नाना पटोले

By राजू हिंगे | Updated: October 8, 2023 15:02 IST

सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेतली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे

पुणे: कॉंग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला एक विचार आहे. ही व्यक्ती विशेष पार्टी नाही असे सांगतानाच ‘केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा एकमेव उद्देश इंडिया आघाडीचा आहे. त्यामुळे तिकीट वाटप आणि जागा वाटप करताना मेरीट हा एकमेव निकष राहणार आहे,’’ असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राज्यातील सरकारच्या कथनी व करणी मध्ये फरक आहे. हे सरकार सेल्फीश सरकार आहे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे अशी टिकाही पटोले यांनी केली.

प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील आढावा बैठकीसाठी पटोले पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणीती शिंदे, विश्वजित कदम, संजय जगताप, संग्राम थोपटे, महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. केंद्रातील आणि राज्यातील महायुतीच्या सरकारवर पटोले यांनी जोरदार टीका केली. 

नाना पटोले म्हणाले, पुणे लोकसभा मतदार संघातील परिस्थिती आता बदलली आहे. आजची परिस्थिती काय आहे, याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांवर होत असलेला अन्यायामुळे जनतेचा कौल भाजपच्या विरोधात आहे. हे कसबा निवडणुकीत दाखवून दिले, असे पटोले यांनी सांगितले.

ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही

वंचित बहुजन विकास आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबाबत पटोले म्हणाले,‘‘ त्यांच्याकडून कोणताही ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेतली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. याचा विचार करून कोणत्या गोष्टीचा आग्रह धरला पाहिजे, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.’’ जातीनिहाय जनगणनासंदर्भात केंद्र सरकारनेच पुढाकर घेऊन ती केली पाहिजे. तरच महिला आरक्षण लागू होऊ शकते. राज्य सरकारने करणे गैर नाही.. यापूर्वीच जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. परंतु त्यांनी मंजूर केला नाही. आम्ही सत्तेत आलो तर पहिले काम ते करू,’’असेही एका प्रश्नाला उत्तर देताना कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपला सत्तेबाहेर काढणे, हा एकमेव उद्देश

राज्यातील सरकारच्या कथनी व करणी मध्ये फरक आहे. हे सरकार सेल्फीश सरकार आहे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे. हे असविधानिक सरकार असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. नांदेड, नागपूर, संभाजीनगर येथे रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्री खुर्चीवर आहे. हे जनतेसमोर जाऊन मांडणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करून भाजपला सत्तेबाहेर काढणे, हा एकमेव उद्देश आहे असे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

धंगेकर यांच्या गैरहजेरीवर उत्तर देणे टाळले

काँग्रेसच्या बैठकीच्या स्थळी पुणे ग्रामीणमधील आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांचे फोटो बॅनर्सवर लावले आहे. मात्र कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार रविंद्र धंगेकर यांचा फोटो बॅनर्सवर नाही. ते गैरहजर आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकर यांच्या गैरहजेरीवर उत्तर देणे टाळले.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसIndiaभारतBJPभाजपाPoliticsराजकारण