शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा इंडिया आघाडीचा एकमेव उद्देश-नाना पटोले

By राजू हिंगे | Updated: October 8, 2023 15:02 IST

सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेतली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे

पुणे: कॉंग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला एक विचार आहे. ही व्यक्ती विशेष पार्टी नाही असे सांगतानाच ‘केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा एकमेव उद्देश इंडिया आघाडीचा आहे. त्यामुळे तिकीट वाटप आणि जागा वाटप करताना मेरीट हा एकमेव निकष राहणार आहे,’’ असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राज्यातील सरकारच्या कथनी व करणी मध्ये फरक आहे. हे सरकार सेल्फीश सरकार आहे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे अशी टिकाही पटोले यांनी केली.

प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील आढावा बैठकीसाठी पटोले पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणीती शिंदे, विश्वजित कदम, संजय जगताप, संग्राम थोपटे, महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. केंद्रातील आणि राज्यातील महायुतीच्या सरकारवर पटोले यांनी जोरदार टीका केली. 

नाना पटोले म्हणाले, पुणे लोकसभा मतदार संघातील परिस्थिती आता बदलली आहे. आजची परिस्थिती काय आहे, याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांवर होत असलेला अन्यायामुळे जनतेचा कौल भाजपच्या विरोधात आहे. हे कसबा निवडणुकीत दाखवून दिले, असे पटोले यांनी सांगितले.

ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही

वंचित बहुजन विकास आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबाबत पटोले म्हणाले,‘‘ त्यांच्याकडून कोणताही ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेतली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. याचा विचार करून कोणत्या गोष्टीचा आग्रह धरला पाहिजे, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.’’ जातीनिहाय जनगणनासंदर्भात केंद्र सरकारनेच पुढाकर घेऊन ती केली पाहिजे. तरच महिला आरक्षण लागू होऊ शकते. राज्य सरकारने करणे गैर नाही.. यापूर्वीच जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. परंतु त्यांनी मंजूर केला नाही. आम्ही सत्तेत आलो तर पहिले काम ते करू,’’असेही एका प्रश्नाला उत्तर देताना कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपला सत्तेबाहेर काढणे, हा एकमेव उद्देश

राज्यातील सरकारच्या कथनी व करणी मध्ये फरक आहे. हे सरकार सेल्फीश सरकार आहे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे. हे असविधानिक सरकार असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. नांदेड, नागपूर, संभाजीनगर येथे रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्री खुर्चीवर आहे. हे जनतेसमोर जाऊन मांडणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करून भाजपला सत्तेबाहेर काढणे, हा एकमेव उद्देश आहे असे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

धंगेकर यांच्या गैरहजेरीवर उत्तर देणे टाळले

काँग्रेसच्या बैठकीच्या स्थळी पुणे ग्रामीणमधील आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांचे फोटो बॅनर्सवर लावले आहे. मात्र कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार रविंद्र धंगेकर यांचा फोटो बॅनर्सवर नाही. ते गैरहजर आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकर यांच्या गैरहजेरीवर उत्तर देणे टाळले.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसIndiaभारतBJPभाजपाPoliticsराजकारण