शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा इंडिया आघाडीचा एकमेव उद्देश-नाना पटोले

By राजू हिंगे | Updated: October 8, 2023 15:02 IST

सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेतली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे

पुणे: कॉंग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला एक विचार आहे. ही व्यक्ती विशेष पार्टी नाही असे सांगतानाच ‘केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा एकमेव उद्देश इंडिया आघाडीचा आहे. त्यामुळे तिकीट वाटप आणि जागा वाटप करताना मेरीट हा एकमेव निकष राहणार आहे,’’ असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राज्यातील सरकारच्या कथनी व करणी मध्ये फरक आहे. हे सरकार सेल्फीश सरकार आहे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे अशी टिकाही पटोले यांनी केली.

प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील आढावा बैठकीसाठी पटोले पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणीती शिंदे, विश्वजित कदम, संजय जगताप, संग्राम थोपटे, महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. केंद्रातील आणि राज्यातील महायुतीच्या सरकारवर पटोले यांनी जोरदार टीका केली. 

नाना पटोले म्हणाले, पुणे लोकसभा मतदार संघातील परिस्थिती आता बदलली आहे. आजची परिस्थिती काय आहे, याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांवर होत असलेला अन्यायामुळे जनतेचा कौल भाजपच्या विरोधात आहे. हे कसबा निवडणुकीत दाखवून दिले, असे पटोले यांनी सांगितले.

ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही

वंचित बहुजन विकास आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबाबत पटोले म्हणाले,‘‘ त्यांच्याकडून कोणताही ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेतली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. याचा विचार करून कोणत्या गोष्टीचा आग्रह धरला पाहिजे, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.’’ जातीनिहाय जनगणनासंदर्भात केंद्र सरकारनेच पुढाकर घेऊन ती केली पाहिजे. तरच महिला आरक्षण लागू होऊ शकते. राज्य सरकारने करणे गैर नाही.. यापूर्वीच जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. परंतु त्यांनी मंजूर केला नाही. आम्ही सत्तेत आलो तर पहिले काम ते करू,’’असेही एका प्रश्नाला उत्तर देताना कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपला सत्तेबाहेर काढणे, हा एकमेव उद्देश

राज्यातील सरकारच्या कथनी व करणी मध्ये फरक आहे. हे सरकार सेल्फीश सरकार आहे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे. हे असविधानिक सरकार असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. नांदेड, नागपूर, संभाजीनगर येथे रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्री खुर्चीवर आहे. हे जनतेसमोर जाऊन मांडणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करून भाजपला सत्तेबाहेर काढणे, हा एकमेव उद्देश आहे असे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

धंगेकर यांच्या गैरहजेरीवर उत्तर देणे टाळले

काँग्रेसच्या बैठकीच्या स्थळी पुणे ग्रामीणमधील आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांचे फोटो बॅनर्सवर लावले आहे. मात्र कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार रविंद्र धंगेकर यांचा फोटो बॅनर्सवर नाही. ते गैरहजर आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकर यांच्या गैरहजेरीवर उत्तर देणे टाळले.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसIndiaभारतBJPभाजपाPoliticsराजकारण