शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

HSC 12th Exam: बारावीचा निकाल वेळेवर लागणार; उत्तरपत्रिका वितरणासाठी पोस्टाची स्वतंत्र यंत्रणा, एस.टी.चा वापर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:32 IST

पुणे : गेले चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी.च्या संपामुळे इयत्ता बारावीचा निकाल उशिरा लागेल, अशी शक्यता व्यक्त ...

पुणे : गेले चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी.च्या संपामुळे इयत्ता बारावीचा निकाल उशिरा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, उत्तरपत्रिकांच्या वितरणासाठी पोस्टाने यंदा स्वत:च्या वाहतूक यंत्रणेचा वापर केला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेतच प्रसिद्ध होईल. निकालावर एस.टी.च्या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षा झाल्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठविल्या जातात. त्यासाठी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्टाकडे जमा केले जातात. यापूर्वी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शिक्षकांकडे पाठविण्यासाठी एस.टी.चा वापर केला जात होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून एस.टी.चा संप आहे. त्यामुळे एस.टी.वर अवलंबून न राहता पोस्ट ऑफिसने स्वत:च्या वाहनांचा वापर करून शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.

उत्तरपत्रिका कशा पाठविल्या जातात ?

उत्तरपत्रिका पोस्टाकडून दिलेल्या पत्त्यावर विना विलंब पाठविल्या जातात. शिक्षक व मॉडरेटर यांना मोटारीच्या साहाय्याने विभागीय मंडळाकडे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोहोचविता येतात. त्याचा खर्चही राज्य मंडळाकडून दिला जातो.

''उत्तरपत्रिकांचे गठ्ठे एस.टी.ने पाठविले जात नाहीत. पोस्टाची स्वतंत्र वाहतूक यंत्रणा त्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत कोणत्याही अडचणी येत नाहीत. शिक्षक व मॉडरेटर वेळेत काम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर होण्यास कोणतीही अडचण नाही.''- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

''पोस्ट विभागाच्या लाल रंगाच्या वाहनांमधून बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची वाहतूक केली जात आहे. एस.टी.चा संप असल्याने पोस्ट कार्यालयाने स्वत:च्या वाहनांमधूनच ही वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे यंदा उत्तरपत्रिका वितरणासाठी एस.टी.वर अवलंबून राहावे लागले नाही.'' -आय. डी. पाटील, सहायक पोस्ट मास्तर, पुणे

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र