शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

HSC 12th Exam: बारावीचा निकाल वेळेवर लागणार; उत्तरपत्रिका वितरणासाठी पोस्टाची स्वतंत्र यंत्रणा, एस.टी.चा वापर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:32 IST

पुणे : गेले चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी.च्या संपामुळे इयत्ता बारावीचा निकाल उशिरा लागेल, अशी शक्यता व्यक्त ...

पुणे : गेले चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी.च्या संपामुळे इयत्ता बारावीचा निकाल उशिरा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, उत्तरपत्रिकांच्या वितरणासाठी पोस्टाने यंदा स्वत:च्या वाहतूक यंत्रणेचा वापर केला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेतच प्रसिद्ध होईल. निकालावर एस.टी.च्या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षा झाल्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठविल्या जातात. त्यासाठी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्टाकडे जमा केले जातात. यापूर्वी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शिक्षकांकडे पाठविण्यासाठी एस.टी.चा वापर केला जात होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून एस.टी.चा संप आहे. त्यामुळे एस.टी.वर अवलंबून न राहता पोस्ट ऑफिसने स्वत:च्या वाहनांचा वापर करून शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.

उत्तरपत्रिका कशा पाठविल्या जातात ?

उत्तरपत्रिका पोस्टाकडून दिलेल्या पत्त्यावर विना विलंब पाठविल्या जातात. शिक्षक व मॉडरेटर यांना मोटारीच्या साहाय्याने विभागीय मंडळाकडे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोहोचविता येतात. त्याचा खर्चही राज्य मंडळाकडून दिला जातो.

''उत्तरपत्रिकांचे गठ्ठे एस.टी.ने पाठविले जात नाहीत. पोस्टाची स्वतंत्र वाहतूक यंत्रणा त्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत कोणत्याही अडचणी येत नाहीत. शिक्षक व मॉडरेटर वेळेत काम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर होण्यास कोणतीही अडचण नाही.''- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

''पोस्ट विभागाच्या लाल रंगाच्या वाहनांमधून बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची वाहतूक केली जात आहे. एस.टी.चा संप असल्याने पोस्ट कार्यालयाने स्वत:च्या वाहनांमधूनच ही वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे यंदा उत्तरपत्रिका वितरणासाठी एस.टी.वर अवलंबून राहावे लागले नाही.'' -आय. डी. पाटील, सहायक पोस्ट मास्तर, पुणे

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणST Strikeएसटी संपMaharashtraमहाराष्ट्र