शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही, हे इंदापूरने शिकवले - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 13:45 IST

विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्यासाठीच केंद्र सरकारकडून सत्तेचा व दडपशाहीचा वापर सुरु

इंदापूर : इंदापूर तालुका शांत विचाराने एकत्रितपणे समाजकारण करणारा तालुका आहे. छप्पन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो. माझ्या आधी दहा वर्षांपूर्वी १९५२ सालापासून शंकरराव पाटील इंदापूरमधून निवडून येत होते. सत्ता कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही, ही गोष्ट इंदापूरने शिकवली. शंकरराव पाटील यांनी राजकारण केले. ते कधी हवेत राहिले नाहीत. सत्ता कधी डोक्यात गेली नाही. नम्रता कधी सोडली नाही. स्वच्छ कारभार कधी सोडला नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या सर्वांना त्यांचे स्मरण होत असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा शेतकरी मेळावा घेण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, गेल्या तीन वर्षांपूर्वी भाजपचा राज्यमंत्री असणाऱ्या खासदाराने आम्हाला घटना बदलायची आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या मागे बहुमत उभा करावे, असे आवाहन मतदारांना केले होते. लोकशाहीत सत्ता मिळणे, ती लोकांसाठी वापरणे, त्याच्यामध्ये काही गैर नाही. देशाच्या पंतप्रधानांना लोकांसाठी राज्य करायला त्यांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्यावे, असे म्हणणे आपण समजू शकतो. मात्र सत्तेचा वापर करून ज्या घटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मूलभूत अधिकार दिले. ती बदलण्याचा घाट घातला जातो आहे. तुमच्या अधिकारावर हल्ला होण्याची शक्यता हा खरा देशापुढचा धोका आहे. तो टाळण्यासाठी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.

विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्यासाठीच केंद्र सरकार सत्तेचा व दडपशाहीचा वापर करत आहे. खा. संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, झारखंडचे मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी यांचे मंत्री, आपचे मंत्री व आत्ता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले, असल्याचेही त्यांनी सांगितले.

चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना बाजूला करा

ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. एका बाजूने महागाई, दुसऱ्या बाजूने बेकारी, तिसऱ्या बाजूने भ्रष्टाचार आहे. हे घालवायचे असेल तर, चुकीचे निर्णय जे घेतात त्यांना सत्तेपासून बाजूला करणे हे तुमचे माझे कर्तव्य आहे. केंद्रीय कृषीमंत्री असताना, कांद्याचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी कांद्याच्या माळा गळ्यात घालून आलेल्या भाजपवाल्यांना तुम्ही कांद्याच्याच काय पण, कवड्यांच्या माळा जरी घालून आलात तरी कांद्याचे दर कमी केले जाणार नाहीत, असे आपण सांगितले होते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणIndapurइंदापूर