शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राष्ट्रकारणाचे वाढते महत्त्व धोक्याचे

By admin | Published: January 24, 2017 2:20 AM

छत्रपती शिवाजीमहाराजांनी आयुष्यभर राष्ट्रकारण केले. आज त्यांचेच नाव घेणारे राष्ट्रवादात दंग झालेले दिसत आहेत. आज राजांची

पुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांनी आयुष्यभर राष्ट्रकारण केले. आज त्यांचेच नाव घेणारे राष्ट्रवादात दंग झालेले दिसत आहेत. आज राजांची शिकवण तर सोडाच; परंतु राष्ट्रवादापुढे राष्ट्रकारणालादेखील महत्त्व न देणारे राजकारणी सभोवताली दिसतात, याची खंत वाटते, असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले. श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आऊसाहेब पुरस्काराचे ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यंदा आऊसाहेब पुरस्काराने शांताबाई नवलखा, लक्ष्मीबाई साळुंके, विमल बऱ्हाटे, जनाबाई आसबे, शांता वाके आणि ताराबाई कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. शिवदास निनाद पुरस्काराने यंदा मुंबईतील दादर येथील अप्पासाहेब परब यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, ज्योतिषशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.परांजपे म्हणाले, ‘‘आदिशक्ती या शब्दात मोठा इतिहास दडलेला आहे. तो लिखित स्वरूपात नाही. भारतीयांची सर्जनशील शक्ती म्हणजे आदिशक्ती होय. इ.स.पूर्व १३ हजार वर्षांहून अधिक पूर्वी मातीचा कलश, घट निर्माण केला गेला. त्याच्यामागचे मूळ चिंतन म्हणजे कोणत्याही पोकळीला आकार दिला, की घट अर्थात अवकाश तयार होते. महाराजांनी असेच राष्ट्रअवकाश घडविले. महाराष्ट्राच्या भूमीला सुपीक आणि सर्जनशील बनवले. महाराजांनी सर्जनशीलता, रसिकता आणि सभ्यता हे त्या अवकाशाची खांब असल्याचे वेळीच जाणले होते. या खांबाची खरी बेरीज म्हणजे खरा धर्म होय. अशा धर्माला प्रचार-प्रसाराची आवश्यकता नसते. या वेळी पुरस्कार्थींच्या वतीने त्यांच्या परिवारातील सदस्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. अप्पासाहेब परब यांच्या मनोगताने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. प्रशांत जगताप यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे राजमिथुन अंबिराज, सूर्यकांत कडू, निनाद नाईक, अभिषेक तिवारी, प्रथमेश केसकर, वैभव जोशी, सत्यम शुक्ला, प्रकाश झा आदी सभासदांनी विशेष प्रयत्न केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. तेजस लडकत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)