शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाढते कोरोना रुग्ण आणि लॉकडाऊनच्या शक्यतेचा उद्योग विश्वाला फटका. पुण्यातील कंपन्यांचे उत्पादन दोन टक्क्यांनी घटले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 15:44 IST

मराठा चेंबर चे सर्वेक्षण अनिश्चिततेमुळे फटका बसला असण्याची शक्यता. केंद्र सरकारने लहान उद्योगांकडे लक्ष देण्याची मागणी.

रुग्ण वाढ आणि लॉकडाऊन ची शक्यता यामधून निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका उद्योग विश्वाला काही प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यातील उद्योग विश्व काही प्रमाणात सावरायला सुरुवात झाली होती. पण लॉकडाउनच्या चर्चा सुरू झाल्या आणि रुग्ण संख्या वाढायला लागली तसा मार्चमध्ये उत्पादनामध्ये मार्च महिन्यात दोन टक्क्यांनी घट झाली आहे. 

 

 मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 48 टक्के कंपन्यांनी त्यांचा उत्पादन हे पूर्वपदावर आल्याचं म्हटलं आहे. तर उर्वरित कंपन्यांनी पूर्वपदावर येण्यासाठी ३ ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल असं सांगितलं आहे. दरम्यान रोजगाराचे प्रमाण मात्र फेब्रुवारी इतकेच म्हणजे 86% राहिले आहे आहे. लॉकडाऊन लागल्यास यात आणखी फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे लॉकडाऊन नकोच अशी भूमिका एमसीसीआयए च्या वतीने घेण्यात आली आहे. 

 

गेल्यावर्षीचा लॉकडाऊन आणि कोरोना याचा फटका उद्योग विश्वाला मोठ्या प्रमाणात बसला होता. त्याच पार्श्वभूमीवर मराठा चेंबर च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. हे बारावे सर्वेक्षण असून यामध्ये कोरोनाचा कंपन्यांवर झालेला परिणाम याचा अभ्यास करण्यात येत आहे. आत्ता करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये पुणे जिल्ह्यातील शंभर कंपन्या सहभागी झाल्या होत्या. 

 

या सर्वेक्षणानुसार कंपन्यांचे उत्पादन हे फेब्रुवारी पेक्षा दोन टक्क्यांनी घटले आहे. तसेच जानेवारी 2020 च्या उत्पादन पातळीवर यायला त्यांना साधारण पुढचे तीन ते सहा महिने लागू शकतात. 48 टक्के कंपन्यांचे उत्पादन हे पूर्व पातळीवर आले आहे तर 19 टक्के कंपन्यांच्या मते साधारण तीन महिन्यांमध्ये ते पूर्वपदावर येईल. तर 17 टक्के कंपन्याना मात्र यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकेल असे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. 

 

याच पार्श्वभूमीवर एमसीसीआयए चे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी लॉकडाऊन नको अशी भूमिका घेतली आहे. "लॉकडाउन लागल्यास उद्योग विश्व पुन्हा कोलमडेल. त्यामुळे लॉकडाऊन ला आमचा विरोध आहे. लसीकरण वाढवल्यास जास्तीत जास्त लोक उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतील" असे मेहता म्हणाले.

 

दरम्यान संचालक प्रशांत गिरबने यांच्या मते " एप्रिल पासून फेब्रुवारी पर्यंत सर्व सर्वेक्षणातून उद्योग विश्व पुन्हा उभे रहात असल्याचे चिन्ह दिसत होते. पण मार्चमध्ये याला थोडा फटका बसलेला दिसत आहे. फर्म जेवढी लहान तेवढा रिकव्हरी ला लागणारा वेळ जास्त आहे. त्यामुळेच सरकारने लहान उद्योगांकडे लक्ष देणे गरजेचे आहे" 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र