शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
4
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
5
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
6
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
7
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
8
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
9
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
12
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
13
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
14
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
15
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
16
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
17
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
18
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
19
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
20
Electric Truck Subsidy: सरकार ई-ट्रकसाठी देणार ९ लाखांपेक्षा अधिक सब्सिडी; जाणून घ्या कसा होणार फायदा?

वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी ठरते पोषक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:00 IST

शेतकरी सुखावला : गहू, हरभरा, कांदा पीक जोमात

वाल्हे : मागील काही दिवसांपासून वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन,वातावरणातील थंडी कमी झाली होती. रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली थंडी पुरेशा प्रमाणात पडत नसल्याने,गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका, ऊस उत्पादन शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत असतानाच,आता वातावरणात बदल होऊन, थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने, रब्बी हंगामातील पिके घेतलेला शेतकरीवर्ग सुखावला आहे.

मागील वर्षांपासून पुरंदर तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागात मॉन्सूनपूर्व व मान्सून, तसेच परतीचा पाऊस प्रमाण अल्प प्रमाणात पडला आहे. यामुळे दक्षिण-पूर्व भागातील अनेक शेतकरीवर्गाच्या खरीप हंगामातील उत्पादन मोठी घट झाली होती. यानंतर, शेतकरीवर्ग रब्बी हंगामातील पिकांपासून उत्पादन घेण्यासाठी धडपडत आहेत.मात्र, या वर्षी डिसेंबर महिन्यातील दुसरा आठवडा सुरू होऊनही देखील, रब्बी हंगामातील पिकांना पोषक थंडी पडत नसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होता. मात्र, चार-पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन, थंडीचे प्रमाणात वाढ होत असल्याने, शेतकरीवर्ग रब्बी हंगामातील पिकांसाठी आशावादी बनत आहेत.

या वर्षीही मान्सूनपूर्व, मान्सून पावसाने पुरंदर तालुक्यात दडी मारल्याने, तसेच परतीचा पाऊस पडला नाही तर, रब्बी हंगामातील पिकांना पाणी देताना मोठी कसरत करावी लागत असून, पाऊस अत्यल्प पडला असल्याने, या वर्षी, रब्बी हंगामातील पिकांना पोषक थंडी पडले की नाही ? याबाबत धास्ती शेतकरीवर्गाला वाटत होती.मात्र,आता पिकांना लाभदायक असलेल्या थंडीस सुरुवात झाल्याने, रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिके सुस्थितीत येतील, अशी आशा शेतकरीवर्गाकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून, अचानक वाढलेली थंडी रब्बी पिकांना फायद्याची ठरत आहे.

मागील चार-पाच दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा सरासरी पारा घटत आहे. गार वाऱ्यामुळे पुरंदर तालुक्यात गारठा वाढला असून, वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका या रब्बीच्या पिकांना चांगलाच फायदा होत आहे.पहाटेपासूनच वातावरणात असलेली कडाक्याची थंडी आणी दिवसभर उन्हामध्येही गारव्याची झुळूक यामुळे हुडहुडी भरत आहे.

हिवाळा सुरू झाल्यापासून यंदा तापमानात बऱ्याचवेळा चढ-उतार झाला आहे. मागील काही महिन्यांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने, थंडी गायब झाली होती, त्यामुळे तापमानात मोठे बदल झाले होते. परिणामी फारशी थंडी जाणवत नव्हती; परंतु दिवाळी सणानंतर, तापमान खाली येत असल्याने थंडी वाढत होती.

मागील काही दिवसांपासून गारठ्यामध्ये अधिकच वाढ झाली आहे. तापमानाने नीचांक गाठला असल्याने, रब्बी पिकांना या थंडीचा मोठा फायदा होईल. यात प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांची वाढ जोमाने होऊन, त्यामधील दाणे परिपक्व होण्यासाठी मदत होईल. पिकांना थंडीही पोषक ठरेल व थंडी अशीच राहिल्यास उत्पादनवाढीस याचा निश्चितच फायदा होईल. इतर पिकांमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना काही पिकांमध्ये मात्र चार पैसे शेतकऱ्यांना मिळतील, अशी आशा शेतकरीवर्गाला आहे.

थंडीचा फळ, फुल उत्पादकांना फटका

थंडीचा कडाका मागील काही दिवसांपासून वाढला असून, यामुळे मात्र फळबागांनासह, फूल उत्पादकांना याचा फटका बसत आहे. पुरंदर तालुक्यात अंजीराचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर घेतले जाते. मात्र,थंडीचा कडाका वाढल्याने,अंजीर ''उकलत'' असून, यामुळे उकललेले अंजीर कवडीमोल बाजारभावात विकावे लागत असल्याने, अंजीर उत्पादक शेतकऱ्यांस आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच फूल उत्पादकांनाही थंडीचा फटका बसत असुन, फुले उमलण्याच्या प्रमाणात घट झाली असल्याने, फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाrabbi seasonरब्बी हंगामCropपीकCrop Managementपीक व्यवस्थापन