शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ; महाराष्ट्रातील 'या' भागात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 08:39 IST

रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते...

पुणे : घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असलेल्या वाऱ्यामुळे संपूर्ण भारतात उष्णतेची लाट आली होती. तिचा परिणाम आता कमी होत असल्याने अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त हवेमुळे कोकणात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. पुण्यात ३९ अंशांपर्यंत कमाल तापमान गेले असताना रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. त्यामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली असली तरी रात्रीच्या तापमानात मोठी वाढ झाली असल्याने उकाडा वाढला आहे.

पुणे शहरात रविवारी कमाल तापमान ३७.८ अंश, तर किमान तापमान २१.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमान सरासरीच्या १.५ अंशाने अधिक होते. त्याच वेळी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ५.२ अशांनी वाढ झाली होती.

मार्च महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान शनिवारी १९ मार्च रोजी ३९.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. कमाल तापमानात घट झाली. त्याच वेळी शनिवारी १८.७ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान रविवारी सकाळी २१.७ अंश सेल्सिअसवर गेले होते.

पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून, तापमान ३८ व २१ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संपूर्ण भारतात उष्णतेच्या लाटेचे श्रेय ५०० एमबी स्तरावर बसलेले मजबूत अँटीसायक्लोन हे असू शकते, जे पृष्ठभागापर्यंत पसरत आहे आणि हवेला खालच्या दिशेने ढकलत आहे.

जसजशी हवा खाली जाते, तसतशी ती संकुचित आणि गरम होते व गरम आणि कोरडे हवामान आणते. शिवाय, फेज ३ मधील एमजेओ देखील ३०० एमबी स्तरावर रिज तयार करीत आहे. ज्यामुळे समुद्राच्या वाऱ्याला किनारपट्टीच्या भागात जाण्यासाठी आणखी प्रतिकार होतो.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSummer Specialसमर स्पेशलRainपाऊसkonkanकोकण