शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

राजगड कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविणार- आमदार संग्राम थोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 15:14 IST

शासनाच्या निर्देशानुसार कारखान्याच्या शेअर्सची किंमत १० हजारांवरून १५ हजार रुपये करण्यासाठी कारखाना पोटनियमात दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला

नसरापूर (पुणे): "१५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याने गाळपासाठी जास्तीचा कालावधी मिळाल्याने गाळप क्षमता १ हजार २५० टनांवरून ३ हजार ५०० टन करण्यात येत आहे. त्यामूळे या वर्षी ३ लाख मेट्रिक टन गाळप उद्दिष्ट साध्य होईल. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व आमदार संग्राम थोपटे यांनी ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. राजगड सहकारी कारखान्याची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धांगवडी (ता. भोर) येथे पार पडली. त्यावेळी थोपटे यांनी माहिती दिली. 

शासनाच्या निर्देशानुसार कारखान्याच्या शेअर्सची किंमत १० हजारांवरून १५ हजार रुपये करण्यासाठी कारखाना पोटनियमात दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी सभासद ठेव योजना, भाग भांडवल वाढ, साखर वाटप, ऊस लागवडी, ऊस दर तफावत, ऊस तोडणी वेळेवर व्हावी, याबाबत सभासद आबासाहेब यादव, अशोक पांगारे, राजेंद्र मोरे, बाळासाहेब गरुड, सचिन बाठे यांनी विचारलेल्या प्रश्नांना कारखाना अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी उत्तरे दिली. सालाबादप्रमाणे सभासदांना वाटप करताना साखरेचे प्रमाण वाढवावे, कारखाना कामगार व ऊस तोडणी कामगारांची तपासणी करण्यात येऊन त्यांचे लसीकरण करावे, अशा मागण्या केल्या. त्यावर अध्यक्ष थोपटे यांनी कामगारांचे लसीकरण झाले असून, येणाऱ्या ऊस तोड कामगारांची तपासणी करण्यात येईल व साखर वाटप प्रमाणाबाबत संचालक मंडळात चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले. शैलेश सोनवणे यांनी आभार मानले.

'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ

यावेळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री अनंतराव थोपटे, उपाध्यक्ष विकास कोंडे, कार्यकारी संचालक सुनील महिंद व संचालक पोपटराव सुके, कृष्णाजी शिनगारे, शोभा जाधव, सीमा सोनवणे, चंद्रकांत सागळे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, उत्तम थोपटे, संदीप नगिणे सर्व संचालक मंडळ या वेळी उपस्थित होते. संचालक शैलेश सोनवणे यांनी आभार मानले. त्या वेळी कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी अहवाल वाचून कार्यक्रमपत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांच्या संमतीने मंजुरी दिली.                         “राजगड कारखान्यातील जुनी यंत्रसामुग्री बदलून पूर्णपणे सर्व नवीन यंत्रसामग्रीसह कारखान्याचे आधुनिकीकरण होत आहे. कारखान्याने मागील वर्षी सुरू केलेल्या इथेनॉल निर्मितीमध्ये आतापर्यंत २५ लाख ४९ हजार ८०५ लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. कारखान्याने १८ मेगावॅट को जनरेशन प्रकल्प सुरु करण्याचे ठरवले असून, त्याचा डीपीआर तयार केला आहे. तसेच, ४५ केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पासाठी कारखान्यास मंजुरी मिळाली असून, लवकरच या प्रकल्पाची उभारणी होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकास जास्त दर देता येईल."- आमदार संग्राम थोपटे, अध्यक्ष, राजगड कारखाना 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड