शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

राजगड कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविणार- आमदार संग्राम थोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 15:14 IST

शासनाच्या निर्देशानुसार कारखान्याच्या शेअर्सची किंमत १० हजारांवरून १५ हजार रुपये करण्यासाठी कारखाना पोटनियमात दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला

नसरापूर (पुणे): "१५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याने गाळपासाठी जास्तीचा कालावधी मिळाल्याने गाळप क्षमता १ हजार २५० टनांवरून ३ हजार ५०० टन करण्यात येत आहे. त्यामूळे या वर्षी ३ लाख मेट्रिक टन गाळप उद्दिष्ट साध्य होईल. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व आमदार संग्राम थोपटे यांनी ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. राजगड सहकारी कारखान्याची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धांगवडी (ता. भोर) येथे पार पडली. त्यावेळी थोपटे यांनी माहिती दिली. 

शासनाच्या निर्देशानुसार कारखान्याच्या शेअर्सची किंमत १० हजारांवरून १५ हजार रुपये करण्यासाठी कारखाना पोटनियमात दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी सभासद ठेव योजना, भाग भांडवल वाढ, साखर वाटप, ऊस लागवडी, ऊस दर तफावत, ऊस तोडणी वेळेवर व्हावी, याबाबत सभासद आबासाहेब यादव, अशोक पांगारे, राजेंद्र मोरे, बाळासाहेब गरुड, सचिन बाठे यांनी विचारलेल्या प्रश्नांना कारखाना अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी उत्तरे दिली. सालाबादप्रमाणे सभासदांना वाटप करताना साखरेचे प्रमाण वाढवावे, कारखाना कामगार व ऊस तोडणी कामगारांची तपासणी करण्यात येऊन त्यांचे लसीकरण करावे, अशा मागण्या केल्या. त्यावर अध्यक्ष थोपटे यांनी कामगारांचे लसीकरण झाले असून, येणाऱ्या ऊस तोड कामगारांची तपासणी करण्यात येईल व साखर वाटप प्रमाणाबाबत संचालक मंडळात चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी केले. शैलेश सोनवणे यांनी आभार मानले.

'कात्रजचा खून झाला'... या फ्लेक्समुळे पुण्यात खळबळ

यावेळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री अनंतराव थोपटे, उपाध्यक्ष विकास कोंडे, कार्यकारी संचालक सुनील महिंद व संचालक पोपटराव सुके, कृष्णाजी शिनगारे, शोभा जाधव, सीमा सोनवणे, चंद्रकांत सागळे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, उत्तम थोपटे, संदीप नगिणे सर्व संचालक मंडळ या वेळी उपस्थित होते. संचालक शैलेश सोनवणे यांनी आभार मानले. त्या वेळी कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी अहवाल वाचून कार्यक्रमपत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांच्या संमतीने मंजुरी दिली.                         “राजगड कारखान्यातील जुनी यंत्रसामुग्री बदलून पूर्णपणे सर्व नवीन यंत्रसामग्रीसह कारखान्याचे आधुनिकीकरण होत आहे. कारखान्याने मागील वर्षी सुरू केलेल्या इथेनॉल निर्मितीमध्ये आतापर्यंत २५ लाख ४९ हजार ८०५ लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. कारखान्याने १८ मेगावॅट को जनरेशन प्रकल्प सुरु करण्याचे ठरवले असून, त्याचा डीपीआर तयार केला आहे. तसेच, ४५ केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पासाठी कारखान्यास मंजुरी मिळाली असून, लवकरच या प्रकल्पाची उभारणी होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकास जास्त दर देता येईल."- आमदार संग्राम थोपटे, अध्यक्ष, राजगड कारखाना 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड