शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

वारकरी परतल्याने जिल्ह्यांत काेराेना वाढण्याची भीती; सतर्कतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 10:16 AM

तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला...

पुणे : संपूर्ण राज्यातून आषाढी वारीसाठी जवळपास १२ लाख भाविक सहभागी झाले हाेते. आता आषाढी झाल्यावर भाविक त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. दरम्यान, पंढरपुरात वारीमध्ये माेठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात आल्याने आता महाराष्ट्रात काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, म्हणून सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

या आषाढी वारीत आळंदी ते पंढरपूर तसेच देहू ते पंढरपूर या दरम्यान लाखाे वारकरी असतात. ते वारकरी पायी प्रवास करतात. यंदा २० जून ते १० जुलै या तीन आठवड्यांचा प्रवास लाखो वारकऱ्यांनी एकत्रित केला. काेराेना प्रादुर्भावातून घातलेल्या निर्बंधामुळे दोन वर्षे वारीच झाली नाही, मात्र त्यानंतर यंदा झालेली वारी ही कोणत्याही निर्बंधांशिवाय आणि सुरक्षेच्या नियमांशिवाय झाली आहे. त्यातच रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

जिल्ह्यांना दिल्या या सूचना...

- तीव्र ताप आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (सर्दी) पसरू नये यावर लक्ष ठेवा

- स्थानिक गरजेनुसार चाचण्यांची संख्या वाढवा

- सुपर स्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवा

- स्थानिक रुग्णवाढीकडे लक्ष द्या. एखाद्या भागात माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असेल तर त्वरित आरोग्य विभागाला कळवावे.

आषाढी वारीतील यात्रेकरू त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर काेरोनाची थाेडी रुग्णवाढ हाेण्याची शक्यता आहे. खासकरून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांनी याबाबत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ही संख्या वाढली तरी येत्या दहा-पंधरा दिवसांत रुग्ण संख्या वाढून परत पूर्वस्थिती येईल.

- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022