शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

भाषण प्रसिद्ध झाल्याने संमेलनाचे झालेय उद्घाटन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 01:10 IST

डॉ. श्रीपाल सबनीस : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मान्यवरांचे विचारमंथन

पुणे : नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निंदनीय प्रकार संयोजन समितीने केला आहे. मात्र, सहगल यांचे भाषण ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संमेलनाचे आजच उद्घाटन झाले आहे, असे मी मानतो. उरलेले संमेलन ११ जानेवारीपासून सुरू होईल. उद्घाटकाविना संमेलन सुरू होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

घडलेला प्रकार सांस्कृतिक व राजकीय व्यवस्थेचेच हे अपयश आहे, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सहगल प्रकरणावर मार्मिक भाष्य केले. राजकीय दबावामुळे आयोजकांनी मागे घेतलेले निमंत्रण, विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रिया याबाबत सबनीस यांच्यासह राजकीय विश्लेषक विश्वंभर चौैधरी आणि अनुवादक प्रशांत तळणीकर यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर भावना व्यक्त केल्या.वादविवाद स्वाभाविक आहेत...विचारस्वातंत्र्याच्या युगामध्ये वादविवाद स्वाभाविक आहेत; मात्र वाद सत्यासाठी की स्वार्थासाठी? हा तात्त्विक मुद्दा आहे. आपल्याकडील राजकीय व्यवस्था साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी सुसंगत, पोषक नाही. याला सर्वच राजकीय पक्ष कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. प्रमुख नेत्याची परवानगी न घेता मनसेच्या स्थानिक पदाधिकाºयाने धमकी देणे आणि त्या दबावापोटी सांस्कृतिक अस्मिता गहाण ठेवून आमंत्रण मागे घेण्याचा प्रकार संयोजन समिती करीत असेल आणि त्यामध्ये महामंडळ कळत-नकळतपणे सहभागी असेल, तर ते निंदनीय आहे. राज ठाकरे यांच्याकडून उशिरा का होईना, दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे, असे श्रीपाल सबनीस म्हणाले.आता ही बाब केवळ साहित्यक्षेत्राशी संबंधित राहिलेली नसून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी जोडली गेली आहे. नयनतारा सहगल यांच्या कुटुंबाचे महाराष्ट्राशी जवळचे नाते आहे. त्या नेहरू घराण्याशी संबंधित आहेत, म्हणून हा निर्णय घेतला असेल तर ते जास्त भयावह आहे. मनसेने संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांचा विविध स्तरांवर निषेध करण्यात आला. एवढ्या छोट्याशा धमकीमुळे घाबरून संयोजक सहगल यांना बोलावणे रद्द करीत असतील, तर अशा वेळी राज्याचे गृह खाते काय करते? तुम्ही एका साहित्यिकेला संरक्षण देऊ शकत नसाल तर ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांकडून केला जात असेल तर आपण गृहमंत्री आहोत, याचा त्यांना विसर पडला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, आयोजकांवर मोठा दबाव निर्माण करण्यात आला. याविरोधात आम्ही आवाज उठविण्याचे ठरवले आहे. - विश्वंभर चौैधरीआयोजकांच्या या कृतीमुळे संमेलनाची नाचक्की झाली आहे. हे प्रकरण विवेकाने हाताळता आले असते, असे मला वाटते. काही अडचणी निर्माण होतील, असे वाटल्यास संयोजक तसेच महामंडळाने एकत्र बसून चर्चा करायला हवी होती. नयनतारा सहगल यांना बोलावण्यामागील भूमिका सुरुवातीला समजून सांगितली असती, तर कदाचित संबंधितांचा विरोध मावळला असता आणि पुढचे रामायण घडले नसते. नयनतारा सहगल यांनी कायमच चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवला आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकांचे जीवन मूल्याधारित होते. आता ही मूल्ये ढासळू लागली, तशा त्या अस्वस्थ होत राहिल्या. अयोग्य गोष्टींना त्यांनी कायम विरोध केला. त्यांच्या लेखनातून त्यांनी कायम राजकीय स्थितीचा आढावा निर्भीडपणे घेतला आहे.- प्रशांत तळणीकरसंयोजन समितीच्या निर्णयाशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असेल, असे मला वाटत नाही. मनसे आणि शेतकरी हक्क संघटना या दोन्ही घटकांच्या भूमिकेच्या दबावाखाली आयोजकांनी हा निर्णय घेतला, हे उघड आहे. आयोजकांनी सत्यनिष्ठता जोपासून आपल्या भूमिकेवर ठाम राहणे आवश्यक होते. त्यांनी विरोधाला न जुमानता आमंत्रण कायम ठेवायला हवे होते. महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. या प्रकरणाला जबाबदार असणारे सर्व घटक आत्मपरीक्षण करायला तयार आहेत का, हे पाहायला हवे. सत्यनिष्ठा जोपासता येत नसेल तर संमेलने घेता तरी कशाला? सहगल यांचे भाषण प्रकाशित झाले म्हणजेच संमेलनाचे उद्घाटन झाले; त्यामुळे आता पुन्हा संमेलनाला जाण्याची मला गरज वाटत नाही.- डॉ. श्रीपाल सबनीस

टॅग्स :Puneपुणे