शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

भाषण प्रसिद्ध झाल्याने संमेलनाचे झालेय उद्घाटन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 01:10 IST

डॉ. श्रीपाल सबनीस : ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मान्यवरांचे विचारमंथन

पुणे : नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निंदनीय प्रकार संयोजन समितीने केला आहे. मात्र, सहगल यांचे भाषण ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संमेलनाचे आजच उद्घाटन झाले आहे, असे मी मानतो. उरलेले संमेलन ११ जानेवारीपासून सुरू होईल. उद्घाटकाविना संमेलन सुरू होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

घडलेला प्रकार सांस्कृतिक व राजकीय व्यवस्थेचेच हे अपयश आहे, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सहगल प्रकरणावर मार्मिक भाष्य केले. राजकीय दबावामुळे आयोजकांनी मागे घेतलेले निमंत्रण, विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रिया याबाबत सबनीस यांच्यासह राजकीय विश्लेषक विश्वंभर चौैधरी आणि अनुवादक प्रशांत तळणीकर यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर भावना व्यक्त केल्या.वादविवाद स्वाभाविक आहेत...विचारस्वातंत्र्याच्या युगामध्ये वादविवाद स्वाभाविक आहेत; मात्र वाद सत्यासाठी की स्वार्थासाठी? हा तात्त्विक मुद्दा आहे. आपल्याकडील राजकीय व्यवस्था साहित्य-संस्कृतीच्या विकासासाठी सुसंगत, पोषक नाही. याला सर्वच राजकीय पक्ष कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. प्रमुख नेत्याची परवानगी न घेता मनसेच्या स्थानिक पदाधिकाºयाने धमकी देणे आणि त्या दबावापोटी सांस्कृतिक अस्मिता गहाण ठेवून आमंत्रण मागे घेण्याचा प्रकार संयोजन समिती करीत असेल आणि त्यामध्ये महामंडळ कळत-नकळतपणे सहभागी असेल, तर ते निंदनीय आहे. राज ठाकरे यांच्याकडून उशिरा का होईना, दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे, असे श्रीपाल सबनीस म्हणाले.आता ही बाब केवळ साहित्यक्षेत्राशी संबंधित राहिलेली नसून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी जोडली गेली आहे. नयनतारा सहगल यांच्या कुटुंबाचे महाराष्ट्राशी जवळचे नाते आहे. त्या नेहरू घराण्याशी संबंधित आहेत, म्हणून हा निर्णय घेतला असेल तर ते जास्त भयावह आहे. मनसेने संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांचा विविध स्तरांवर निषेध करण्यात आला. एवढ्या छोट्याशा धमकीमुळे घाबरून संयोजक सहगल यांना बोलावणे रद्द करीत असतील, तर अशा वेळी राज्याचे गृह खाते काय करते? तुम्ही एका साहित्यिकेला संरक्षण देऊ शकत नसाल तर ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांकडून केला जात असेल तर आपण गृहमंत्री आहोत, याचा त्यांना विसर पडला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, आयोजकांवर मोठा दबाव निर्माण करण्यात आला. याविरोधात आम्ही आवाज उठविण्याचे ठरवले आहे. - विश्वंभर चौैधरीआयोजकांच्या या कृतीमुळे संमेलनाची नाचक्की झाली आहे. हे प्रकरण विवेकाने हाताळता आले असते, असे मला वाटते. काही अडचणी निर्माण होतील, असे वाटल्यास संयोजक तसेच महामंडळाने एकत्र बसून चर्चा करायला हवी होती. नयनतारा सहगल यांना बोलावण्यामागील भूमिका सुरुवातीला समजून सांगितली असती, तर कदाचित संबंधितांचा विरोध मावळला असता आणि पुढचे रामायण घडले नसते. नयनतारा सहगल यांनी कायमच चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवला आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकांचे जीवन मूल्याधारित होते. आता ही मूल्ये ढासळू लागली, तशा त्या अस्वस्थ होत राहिल्या. अयोग्य गोष्टींना त्यांनी कायम विरोध केला. त्यांच्या लेखनातून त्यांनी कायम राजकीय स्थितीचा आढावा निर्भीडपणे घेतला आहे.- प्रशांत तळणीकरसंयोजन समितीच्या निर्णयाशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असेल, असे मला वाटत नाही. मनसे आणि शेतकरी हक्क संघटना या दोन्ही घटकांच्या भूमिकेच्या दबावाखाली आयोजकांनी हा निर्णय घेतला, हे उघड आहे. आयोजकांनी सत्यनिष्ठता जोपासून आपल्या भूमिकेवर ठाम राहणे आवश्यक होते. त्यांनी विरोधाला न जुमानता आमंत्रण कायम ठेवायला हवे होते. महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. या प्रकरणाला जबाबदार असणारे सर्व घटक आत्मपरीक्षण करायला तयार आहेत का, हे पाहायला हवे. सत्यनिष्ठा जोपासता येत नसेल तर संमेलने घेता तरी कशाला? सहगल यांचे भाषण प्रकाशित झाले म्हणजेच संमेलनाचे उद्घाटन झाले; त्यामुळे आता पुन्हा संमेलनाला जाण्याची मला गरज वाटत नाही.- डॉ. श्रीपाल सबनीस

टॅग्स :Puneपुणे