शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात ८ हजारांहून अधिक जणांनी सोडले रेशनवरील धान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 13:10 IST

शहरातील अ परिमंडळात सर्वाधिक ७०७ व जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १६१२ जणांनी असा हक्क सोडला आहे...

पुणे : अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी निकषात बसत नसल्यास स्वत: बाहेर पडण्यासाठी ‘गिव्ह इट अप’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या उपक्रमात जिल्ह्यात आतापर्यंत ७१५६ जणांनी तर शहरात २८२० जणांनी रेशनवरील धान्याचा हक्क सोडला आहे. त्यात शहरातील अ परिमंडळात सर्वाधिक ७०७ व जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १६१२ जणांनी असा हक्क सोडला आहे.

शहर, जिल्ह्यात रेशनचे ४० लाख लाभार्थी

जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजना व प्राधान्य योजनेत २६ लाख ७१ हजार १५६ लाभार्थी आहेत, तर शहरात सुमारे साडेतेरा लाख लाभार्थी आहेत. दोन्ही मिळून ४० लाख लाभार्थी आहेत.

काय आहे ‘गिव्ह इट अप’ उपक्रम

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता पात्र असलेल्या लाभार्थींना लाभ घेण्याची आवश्यकता नसल्यास असे लाभार्थी ते नाकारू शकतात.

कोणत्या तालुक्यात किती जणांनी सोडला रेशनचा हक्क?

तालुका             रेशनचा त्याग केलेले

हवेली                         १७५

बारामती             १६१२

आंबेगाव             ३४२            

भोर                         १८७

दौंड                         ७५०

इंदापूर                         १४६५

जुन्नर                         ४३२

खेड                         ५७५

मावळ                         ४३८

मुळशी                         १३०

पुरंदर                         ४०९

शिरूर                         ६००

वेल्हे                         ४१

एकूण                         ७१५६

शहरातील परिमंडळानुसार रेशनचा हक्क सोडलेले नागरिक

अ             ७०७

ब             ६१

क             १७८

ड             १२५

ई             २०१

फ             १५३

ग             ४९

ह             ४१९

ज             २०९

ल             २४१

म             ४७७

एकूण             २८२०

सप्टेंबर अखेरपर्यंत वाढविली मुदत-

या उपक्रमाला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

धान्य सोडण्याचा हक्क हा ऐच्छिक आहे. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे तसेच रेशनवरील धान्याची गरज नाही अशांनी तो सोडावा जेणेकरून अन्य गरजूंना त्याचा लाभ देता येईल.

- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे

मला रेशनवरील धान्याची आवश्यकता नसल्याने मी स्वतःहून हा हक्क सोडला आहे.

- अनंत देशपांडे, कात्रज

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र