शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

भीतीच्या वातावरणात मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघाले; बारामतीच्या विद्यार्थिनीचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 12:02 IST

आम्ही तणाव अन् भीतीच्या वातावरणात मिळेल तेवढा भात व भाजी खाऊन कसेबसे दिवस काढले

प्रशांत ननवरे

बारामती : सुमारे चार ते पाच दिवस कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. येथे परिस्थिती चिघळलेली होती, अशा वातावरणात मिळेल तेवढा भात व भाजी खाऊन आम्ही कसेबसे दिवस काढले. आमच्या होस्टेलच्या गेटच्या समोर ग्रेनाइट फुटून मोठी आग लागताना आम्हाला दिसत होती. प्रत्यक्षात नाही पण तेथील गंभीर प्रसंगाचे वायरल झालेले व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप होत असे. तब्बल पाच दिवस कर्फ्यू लावण्यात आला होता. इंटरनेट सह इतर सुविधा बंद होत्या, अशा शब्दात बारामतीच्या अश्वगंधा पारडे  या विद्यार्थिनीने मणिपुरच्या परीस्थितीचा अंगावर शहारे आणणारा अनुभव ‘लोकमत’शी बोलताना कथन केला.

अधिक माहिती देताना अश्वगंधा या विद्यार्थीनीने सांगितले,  मी पुण्यातील गरवारे कॉलेजची माजी विद्याथीर्नी आहे. सध्या नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, इंफाळ येथे दोन वर्षांपासून मास्टर्स स्पोर्ट्स सायकललॉजीचे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण घेत आहे. माझे शिक्षण पूर्ण होत आले असून केवळ परीक्षा देणे बाकी आहे. परंतु, ३ मे रोजी सायंकाळी चार-पाच वाजता मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघाले. मणिपूर मध्ये सर्वत्र तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक स्थानिक नागरिकांना निर्माण झालेल्या वातावरणामुळे मणिपूर सोडून आसाम राज्यात आश्रयासाठी जावे लागले. गेल्या  गेल्या दोन वर्षात तीन वेळा असे प्रसंग आले होते. त्यावेळी एक दोन दिवसांत वातावरणातील तणाव शांत होत असे. परिस्थिती पूर्ववत होत असे. यंदा चौथ्या वेळी प्रथमच परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली. आमच्या होस्टेलच्या गेटच्या समोर ग्रेनाइड फुटून मोठी आग लागताना आम्हाला दिसत होती. प्रत्यक्षात नाही पण तेथील गंभीर प्रसंगाचे वायरल झालेले व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप होत असे.परंतु लष्कर आणि एनएसजीचे कमांडर आल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळली.                      कॉलेज आम्हाला घरी सोडायला तयार नव्हते. जबाबदार देखील घ्यायला तयार नव्हते. होस्टेलमधून बाहेर पडण्यास परवानगी देखील नव्हती. यामध्ये मणिपुरी विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. तसेच मेसमध्ये काम करणाºया तेथील स्थानिक कामगारांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आमचे जेवणाचे हाल होऊ लागले. भात आणि भाजी असेल तर देण्यात येत. नाष्ट्यामध्ये ब्रेड आणि उकडलेले अंडे मिळत असे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाण्यास सुरूवात झाल्याचे दिसताच मी माझ्या पप्पांना संपर्क साधला. माझ्या प्रमाणेच इतर विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या पालकांना संपर्क साधला. शेवटी महाराष्ट्र शासनाने आम्हाला स्वतंत्र विमानाद्वारे महाराष्ट्रात आणले. त्यासाठी इम्फाळमधून मणीपूर स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये आम्हां २५ विद्यार्थ्यांना पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. तेथुन विमानाने गुवाहाटीला आणण्यात आले.

पप्पांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांचे  बोलणे झाले असून काळजी करू नका, असा दिलासा दिला. आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोग्य आणि जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही घरी या अशी महत्त्वाची भूमिका घेतली. महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून आम्हाला सुरक्षितरीत्या आणले. आम्हाला विमानाने गुहाटी मार्गे मुंबईपर्यंत आणले. मी मंगळवारी (दि ९) पुण्यात सुखरूप पोहोचले.माझे वडील डॉक्टर असून सरकारी सेवेत आहेत. आई गृहिणी आहे. मला परत घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला.आम्हाला राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे आभार मानते,असेही अश्वगंधा पारडे हिने सांगितले. 

...या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही

माझ्या दोन विषयांची परीक्षा २१ जुन रोजी आहे.तेवढ्या दोन विषयांच्या परीक्षेसाठी जावे लागणार आहे.कॉलेज आॅनलाईन परीक्षा घेण्यास तयार नाहि.परीस्थिती न निवळल्यास परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.त्यानंतर काय होणार,या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाहि,अशी व्यथा अश्वगंधा पारडे या विद्यार्थीनीने सांगितली.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीWomenमहिलाStudentविद्यार्थीEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र