शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 11, 2017 04:01 IST

पावसाळा दारात येऊन ठेपला, तरीही पालिका प्रशासनाने अद्याप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे पूर्ण केलेली नाहीत. परिणामी, शहरातील झोपडट्टीत

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पावसाळा दारात येऊन ठेपला, तरीही पालिका प्रशासनाने अद्याप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे पूर्ण केलेली नाहीत. परिणामी, शहरातील झोपडट्टीत राहणाऱ्या नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नदीपात्रातील गाळ, जलपर्णी काढण्यासह डे्रनेज सफाईची कामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासनाने दिरंगाई केली असल्यास दिसून येत आहे.जिल्हा प्रशासनातर्फे पूर नियंत्रण स्थिती व पावसाळा पूर्वतयारीसाठी महिनाभरापूर्वी आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यात पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी विभागांसह पालिका व पोलीस प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या कामांची पूर्तता करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. नदीपात्रालगत, पात्रातील झोपडपट्ट्या व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून योजना करावी. तसेच, नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढण्याचे आणि गटारसफाई करणे, औषधफवारणी, धोकादायक वृक्षांची छाटणी करणे आदी कामांसह जुन्या पुलांची व जुन्या इमारतींची बांधकामे पावसाळ्यापूर्वी करून घ्यावीत, अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.मॉन्सून काही तासांवर येऊन ठेपलेला असताना शहरातील नालेसफाईसह डे्रनेज सफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शहरातील पुलांच्या डागडुजीची कामे सुरू आहेत. पुलांच्या डागडुजीसाठी नदीपात्रात मातीचे बंधारे घालून ठेवण्यात आले आहेत. गणेश पेठेसह आणखी काही ठिकाणी डे्रनेज फुटलेल्या स्थितीत आहेत. पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे ३१ मेपूर्वी करण्याची मुदत आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत डे्रनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते उकरले जात आहेत. नदीपात्रातील झोपड्या हटविण्याबाबत हालचाली झाल्या नाहीत.उकरलेल्या रस्त्ते अद्यापही बुजविले नाहीत- शहरातील काही मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये रस्ता उकरून डे्रनेजसाठी पाईप टाक ले आहेत. मात्र, उकरलेल्या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरणे केलेले नाही. त्याचप्रमाणे रस्त्यात पडलेले खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. - पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यातील सर्व पुलांची, जुन्या इमारतींची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, रस्त्यांच्या साईडपट्ट्या भरून घेणे आवश्यक आहे. खेड-शिवापूर येथील घटनेची पूनरावृत्ती होऊ नये, यासाठी रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार करावेत.आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे विविध विभागांकडून केली जात आहेत. काही विभागांनी कामाची पूर्तता झाली असल्याचे कळविले आहे; परंतु नालेसफाई, डे्रनेज सफाई, जलपर्णी काढणे आदी कामे सुरू आहेत. नियंत्रण कक्षामध्ये नोडल आॅफिसरची नेमणूक केली आहे.- गणेश सोनुने, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन, पुणे महापालिका