शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

जास्त मस्ती कराल तर घरी जाल; मुख्यमंत्री फडणवीसांनी दम दिल्याची माणिकराव कोकाटेंची कबुली

By नितीन चौधरी | Updated: February 24, 2025 17:01 IST

जनतेच्या आशीर्वादाने राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाल्याचे सांगून कोकाटेंनी शिंदे गटाचे नाव न घेता कुणाच्याही जाण्याने सरकारला धोका नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले

पुणे: तुमच्या जाण्याने सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, अगदी माझ्या जाण्यानेही नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल, असा दमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत दिला होता, अशी कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. आमचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारीही मुख्यमंत्रीच ठरवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी पणनमंत्री जयकुमार रावल, आमदार दिलीप बनकर, अनुराधा चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, सहकार आयुक्त दीपक तावरे, पणन संचालक विकास रसाळ, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम उपस्थित होते.

जनतेच्या आशीर्वादाने राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाल्याचे सांगून कोकाटे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नाव न घेता कुणाच्याही जाण्याने सरकारला धोका नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले.

विभागाचे काम शिस्तीत झाले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचा कार्यक्रमच दिला आहे. त्यानुसार काम करायचे आहे, असे कोकाटे म्हणाले. आता आमचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारीही मुख्यमंत्रीच ठरवतात, असे स्पष्ट करून आमच्या हातात आता काहीही राहिले नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे आता आम्हाला काम करावेच लागेल. पण पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही चांगले काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्य अधिकाऱ्यांनी सरकारसोबत नीट सांगड घालून काम केल्यास राज्यात स्थैर्य व शाश्वती निर्माण होईल. त्यातून विकासाकडे जाता येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे मी बाजार समित्यांना कमी लेखत नाही. याच समित्यांमुळे अनेकजण आमदार, खासदार झाले आहेत. राजकारणात उद्याचे भविष्य तुमच्या हातात आहे, असे बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधून सरकार निर्माण करण्याचे काम समित्या करत असल्याचे ते म्हणाले. तुमच्यात क्षमता असून, ती कामाला लावून जास्तीत जास्त लोकाभमिमुख काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

वरच्या न्यायालयात अपील

पात्रता नसताना नाशिक येथे म्हाडाचे घर घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या कोकाटे यांनी आता वरच्या अर्थात जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत विचारले असता, या अपिलानंतर आमदारकीसाठी पात्र आहे किंवा नाही, याचा फैसला होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManikrao Kokateमाणिकराव कोकाटेMahayutiमहायुतीBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार