शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule: नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:22 IST

जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार घटनाबाह्य काम करत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही

पुणे : नक्षलवाद संपला असे केंद्र व राज्य सरकार म्हणत आहे, तरीही काही राहिलाच असेल तर त्यासाठी सध्या आहे ते कायदे पुरेसे आहेत, मग सरकार जनसुरक्षा विधेयक आणून ते नक्षलवाद संपवण्यासाठी आहे, असे सरकार जाहीरपणे कशासाठी सांगते आहे? अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार घटनाबाह्य काम करत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.

सरकारी दडपशाहीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे राज्य प्रवक्ते महेश तपासे, मनाली भिलारे, आरपीआयचे सचिन खरात, विशाल तांबे, मनाली भीलारे, शेखर धावडे, डॉ. निकिता गायकवाड, मंजिरी घाडगे, श्रद्धा जाधव, पायल चव्हाण, फईम शेख, युसुफ शेख, नरेश पगाडल्लू, वंदना मोडक, शैलेंद्र बेल्हेकर, सागर खांदवे व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सुळे म्हणाल्या, ‘ज्यावेळी हे विधेयक आले, त्यावेळी आमच्यासह अन्य राजकीय पक्षांनाही त्याला विरोध केला. त्यासाठीच्या समितीत आम्ही होतो, त्यावेळी विधेयकात बऱ्याच दुरूस्त्याही सुचवल्या होत्या. मात्र विधेयकाचा अंतीम मसुदा तयार करताना त्याचा विचारच झाला नाही. जनसुरक्षा विधेयक घटनाविरोधी आहे असे आम्ही नाही तर अनेक अभ्यासक, तज्ज्ञ सांगतात. हे देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेनुसारच चालणार हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. आम्ही सरकारची ही दडपशाही खपवून घेणार नाही. त्याचा प्रतिकार करू.’ सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी