शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पंचकर्म शिकवायचेय तर हवेत २०० बेड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 1:36 AM

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची जाचक अट; संस्थाचालक अडचणीत

- श्रीकिशन काळेपुणे : शरीर शुद्ध करायचे असेल, तर पंचकर्माशिवाय चांगला पर्याय उपलब्ध नाही. सध्या पंचकर्म विद्यार्थ्यांना शिकवायचे असेल, तर संबंधित संस्थेकडे सुमारे २०० बेड असणे बंधनकारक आहे. अशी अटच महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठाने लावली आहे. त्यामुळे पंचकर्म शिकविणारे संस्थाचालक डोक्याला हात लावून बसले आहेत.नाशिक येथील महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयुर्वेद सर्टिफिकेट, फेलोशिप कोर्सेस खासगी संस्थांद्वारे चालविण्यासाठी देण्यात येतात. परंतु, त्यासाठी या संस्थांना विद्यापीठाकडे शुल्क भरावे लागते. सध्या पंचकर्म आणि आयुर्वेद प्रमाणपत्राचे केंद्र चालवायचे असेल, तर २ लाख ४० हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे, तर त्या केंद्राकडे २०० बेडही असायला पाहिजेत. अशा अटी विद्यापीठाने घातल्या आहेत.त्यामुळे छोट्या संस्थांना हे कोर्सेस सुरू करता येणार नाहीत. परिणामी प्रशिक्षित मनुष्यबळच कमी निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला असून, या जाचक अटी कमी करण्याची मागणी डॉक्टर्सकडून होत आहे. सध्या प्रचंड प्रदूषण, बदललेली जीवनशैली, अवेळी जेवण या सर्वांचा परिणाम शरीरावर होत आहे. त्यामुळे पंचकर्म, मसाज यांची मागणी वाढत असून, त्याकडे नागरिकांचा कल अधिक दिसून येत आहे. आम्ही संस्थेद्वारे नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील आयुर्वेद पंचकर्म, कॉस्मेटोलॉजी, नर्सिंग इतर कोर्सेससाठी अर्ज करण्याचे ठरविले होते. परंतु, त्यासाठी असलेली फी आणि बेडची अट आम्हाला न पेलवणारी आहे. मग हे कोर्सेस कुठेच चालणार नाहीत. या जाचक अटी रद्द करून शुल्क कमी करावे, अशी आमची मागणी आहे, असे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुहास शितोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सध्या भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे पंचकर्म करण्यासाठी माणसे / थेरपिस्टची कमतरता आहे. सध्या देशात वा परदेशात पंचकर्म याविषयी जागरूकता झालेली आपण पाहतो. कारण अनेक व्याधी या औषधांना जुमानत नाहीत. अशावेळी पंचकर्मामुळे व्याधीला कारणीभूत असणारे घटक शरीराबाहेर काढले जातात. यामुळे आजार लवकर होण्यास मदत मिळते. अशा या पंचकर्म करणारी थेरपिस्टची असणारी कमतरता ही वैद्याच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे. जर असे मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी लाखो रुपये शुल्क द्यावे लागत असेल, तर कोणीच हे कोर्सेसचालविणार नाही. - डॉ. सुहास परचुरे, आयुर्वेदतज्ज्ञपंचकर्म आणि आयुर्वेद प्रमाणपत्र शिकविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सेंटरचे शुल्क कमी करण्याचा विचार सुरू आहे. तसचे २०० बेडचे रुग्णालय असावे, अशी अट आहे. तेदेखील कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.- डॉ. कालिदास द. चव्हाण, कुलसचिव,महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठ

टॅग्स :Healthआरोग्य