शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

अशीच परिस्थिती राहिली तर देशातील लोकशाही, संविधानाला धोका : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 09:39 IST

महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले....

पुणे : निवडणूक कुणाला सत्तेवर बसवण्यासाठी नसून नागरिकांचे अधिकार शाबूत ठेवण्यासाठी असते. सध्याच्या सरकारकडून संविधानाची चौकट मोडली जात असून लोकांना बंदिस्त केले जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लोकशाही, संविधानाला धोका आहे. त्यामुळे आता महात्मा फुले, राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या मतदारांनी एकत्रित येण्याची गरज असून मुस्लिमांनाही सोबत घ्यावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आयोजित सत्ता परिवर्तन सभेत केले. महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले.

आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दंगली घडविल्या जाण्याची शक्यता आहे. सरकार ज्या पद्धतीने दडपशाहीचे काम करत आहे त्याला घाबरून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. असेच दडपशाहीचे राजकारण सुरू राहिले तर लोकशाही टिकेल का, संविधान टिकेल का, असा प्रश्न उपस्थित करत हेच सरकार पुन्हा निवडून दिल्यास बंदिस्त लोकशाही येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंडे, मुन्नवर कुरेशी आदी उपस्थित होते.

जरांगे यांना निवडणूक लढविण्याचा सल्ला

सध्याच्या राज्य सरकारने ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण केला आहे. ओबीसींचे ताट वेगळे असावे व गरीब मराठ्यांचे ताट वेगळे असावे, अशी वंचितची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे त्यासाठीच लढाई लढत असून त्यांनी आता हिंमत करून निवडणूक लढवावी, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPuneपुणेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी