शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

अशीच परिस्थिती राहिली तर देशातील लोकशाही, संविधानाला धोका : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 09:39 IST

महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले....

पुणे : निवडणूक कुणाला सत्तेवर बसवण्यासाठी नसून नागरिकांचे अधिकार शाबूत ठेवण्यासाठी असते. सध्याच्या सरकारकडून संविधानाची चौकट मोडली जात असून लोकांना बंदिस्त केले जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लोकशाही, संविधानाला धोका आहे. त्यामुळे आता महात्मा फुले, राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या मतदारांनी एकत्रित येण्याची गरज असून मुस्लिमांनाही सोबत घ्यावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आयोजित सत्ता परिवर्तन सभेत केले. महाविकास आघाडीसोबत जाण्याची आपली मनापासून इच्छा असली तरी आघाडी होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचेही ते म्हणाले.

आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दंगली घडविल्या जाण्याची शक्यता आहे. सरकार ज्या पद्धतीने दडपशाहीचे काम करत आहे त्याला घाबरून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. असेच दडपशाहीचे राजकारण सुरू राहिले तर लोकशाही टिकेल का, संविधान टिकेल का, असा प्रश्न उपस्थित करत हेच सरकार पुन्हा निवडून दिल्यास बंदिस्त लोकशाही येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे, टी. पी. मुंडे, मुन्नवर कुरेशी आदी उपस्थित होते.

जरांगे यांना निवडणूक लढविण्याचा सल्ला

सध्याच्या राज्य सरकारने ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण केला आहे. ओबीसींचे ताट वेगळे असावे व गरीब मराठ्यांचे ताट वेगळे असावे, अशी वंचितची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे त्यासाठीच लढाई लढत असून त्यांनी आता हिंमत करून निवडणूक लढवावी, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPuneपुणेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी